ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
कृषी कायद्यांविरोधात मागील 2 महिन्यांपासून सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला सिंधू बॉर्डरवर वेगळे वळण मिळाले आहे. सिंधू बॉर्डरवरील आंदोलन सुरू ठेण्यावर शेतकरी ठाम आहेत. त्यामुळे तेथील स्थानिकांनी शेतकऱ्यांविरोधात घोषणाबाजी करत हा परिसर मोकळा करण्याची मागणी केली. यावेळी शेतकरी आणि स्थानकांमध्ये संघर्ष पेटल्याने पोलिसांना अश्रूधूराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या.
सिंधू बोर्डरवर स्थानिक नागरिक मोठ्या प्रमाणात एकत्र आले आहेत. हातात तिरंगा घेऊन ‘भारत माता की जय’ च्या घोषणा ते शेतकऱ्यांना परिसर मोकळा करण्याची मागणी करत आहेत. यावेळी निर्माण झालेली तणावाची परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना अश्रूधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या.