गंगटोक ः
सिक्कीम, आसाम, बिहारसह पूर्व आणि उत्तरेकडील राज्यांना सोमवारी रात्री भूकंपाचा जोरदार धक्का बसला. भूकंपमापन यंत्रावर याची तीव्रता 5.4 रिश्टर स्केल इतकी नोंद झाली आहे. सोमवारी रात्री 8 वाजून 49 मिनिटांनी धक्का जाणवला. याचे केंद्र भारत-भूतान सीमारेषेजवळ गंगटोक येथे असल्याचे सांगण्यात आले. याबाबत तत्काळ कोठेही जीवितहानी झाल्याचे वृत्त समजले नाही. तरीही या तीव्र धक्क्यानंतर अनेक लोक भीतीमुळे घराबाहेर पडले होते. पहिल्या मोठय़ा धक्क्यानंतर पुन्हा सौम्य धक्क्यांची जाणीवही काहींना झाली.