अनलॉक-3’ वर विचारमंथन सुरू : शाळा-महाविद्यालयांसह मेट्रो रेल्वे मात्र बंदच राहणार
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
पुढील महिन्यापासून सुरू होणाऱया ‘अनलॉक-3’साठी नियमावली बनविण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. 31 जुलै रोजी अनलॉक-2 समाप्त होत आहे. त्यामुळे गेल्या चार महिन्यांपासून बंदावस्थेत असलेली सिनेमागृहे सामाजिक अंतरासह उघडण्याचा विचार आहे. यासंबंधी माहिती प्रसारण मंत्रालयाने याबाबत गृह मंत्रालयाकडे प्रस्ताव पाठविला आहे. तसेच व्यायामशाळांनाही (जिम) अनुमती मिळण्याची शक्यता आहे. व्यायामशाळा आणि चित्रपटगृह सुरू होण्याची शक्मयता असली, तरी शाळा-महाविद्यालये आणि मेट्रो रेल्वेसेवा अजून काही काळ बंदच राहणार आहे. या ठिकाणी होणारी गर्दी लक्षात घेऊन सरकार या गोष्टी सुरू करण्यास लांबणीवर टाकू शकते.
माहिती प्रसारण मंत्रालय आणि सिनेमागृह मालकांमध्ये अनेक चर्चेच्या फेऱया झाल्या होत्या. या चर्चेत सिनेमागृह मालकांनी 50 टक्के प्रेक्षकांसह थिएटर सुरू करण्यास सहमती दर्शविली आहे. तथापि, सध्या केवळ 25 टक्के प्रेक्षकांसह सिनेमागृहे सुरू करण्याचा निर्णय या महिन्याच्या अखेरपर्यंत होऊ शकतो. तसेच अनलॉक-3 मध्ये सिनेमागृहांसोबत व्यायामशाळाही उघडता येऊ शकेल. याबाबत राज्यांना परिस्थितीनुरुप नियमात सुधारणा करण्याची अनुमतीही केंद्र सरकारकडून दिली जाणार आहे.
31 जुलै रोजी अनलॉक-2 संपणार आहे. त्यामुळे 1 ऑगस्टपासून नियमावलीत बदल होणार आहे. कोरोनाच्या संकटानंतर केंद्र सरकारने सलग अडीच महिने कडक लॉकडाऊन लागू केल्यानंतर शिथिलता देण्यास सुरूवात केली होती. पहिल्या अनलॉकमध्येच केंद्र सरकारने बऱयाच बाबी शिथिल केल्या असल्या तरी राज्य सरकारांनी सावधगिरीसाठी कंटेनमेंट क्षेत्रांमध्ये अनेक निर्बंध कायम ठेवले आहेत. निर्बंध असूनही कोरोना संसर्ग वाढत असल्यामुळे अजून काही दिवस नागरिकांना सावधगिरी बाळगावी लागणार आहे.