कामाठीपुऱयात विळखा पडला ग्रामीण भागात बाधितांची संख्या वाढती
प्रतिनिधी/ सातारा
सातारा शहरात क्रांतीसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयात धोबीकाम करणाऱयाचा 25 वर्षीय मुलगा गेल्या आठ दिवसापूर्वी तापाने आजारी होता. त्यास येथील सातारा हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केला होता. उपचारादरम्यान, काल दुपारी मृत्यू झाला. त्याचा कोव्हिड रिपोर्ट बाधित आल्याने त्याच्यावर कैलास स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या वडिलांना आणि घरातल्याना कोरोनटाईन करण्यात आले आहे. दरम्यान, शहरातील कामाठी पुऱयात आता विळखा पडला असून ग्रामीण भागात आढळून येत आहेत.
शहरात कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. प्रशासनाकडून साखळी तोडण्यासाठी प्रयत्न होत आहेत. मात्र, काही रुग्ण हे बिनधास्तपणे फिरत असतात. त्यांच्यामुळे रुग्ण वाढत आहेत. क्रांतीसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयात धोबी काम करत असलेल्याच्या मुलास आठ दिवसांपूर्वी ताप आला होता. तो शिक्षण घेत होता. त्यास सुरुवातीला न्यूमोनिया झाल्याचे सांगण्यात आले. त्याची प्रकृती दिवसेंदिवस ढासळू लागली. दोन दिवसापुर्वी अंत्यत बिकट परिस्थिती निर्माण झाली होती. काल त्याचा सकाळी मृत्यू झाला. त्याचे कुटुंबिय जुना दवाखाना गुरुवार पेठ या परिसरात रहात आहे. त्याच्या वडिलासह सर्व कुटुंबियांना कोरोनटाईन करण्यात आले असून त्यांचेही स्वाब घेण्यात आले आहेत. मुलांच्या मृत्यूने दुखाचा डोंगर त्या कुटुंबावर कोसळला आहे. दरम्यान, कैलास स्मशानभूमीत काल दुपारीच अंत्यसंस्कार कोरोनाच्या निकषानुसार करण्यात आलेत. सातारा तालुक्यातील रामकृष्णनगर येथील 24, 45,48 वर्षिय पुरुष व 11 वर्षीय बालक, 42,42,42,20 वर्षीय महिला व 13 वर्षीय बालीका व 18 वर्षीय तरुणी, कण्हेर येथील 27, 29,29 वर्षीय महिला,34,40,41,40 वर्षीय पुरुष व 4 व 7 वर्षीय बालक,शेंद्रे येथील 22 वर्षीय महिला, कुस येथील 65,32 वर्षीय महिला 46 वर्षीय पुरुष, गोडोली येथील 30,26 वर्षीय पुरुष 45 वर्षीय महिला, अमर लक्ष्मी सोसायटी संभाजीनगर येथील 63,39,46, वर्षीय पुरुष व 12 वर्षीय बालक 32,71,43 वर्षीय महिला व 14 वर्षीय बालीका, कामाठीपुरा येथील 20 वर्षीय पुरुष बाधित आढळून आले आहेत.