वन्यप्राणी-पक्ष्यांची तस्करी रोखण्यासाठी सतर्क : शाळा-कॉलेजमध्ये जाऊन जागृती, जनतेकडूनही सहकार्याची अपेक्षा
वन्यप्राणी, पशुपक्ष्यांची तस्करी रोखण्यासाठी वेगवेगळी सरकारी यंत्रणा कार्यरत आहे. खासकरून वनविभागावर ही जबाबदारी अधिक असते. पोलीस दलाकडूनही जंगली जनावरे व वनसंपदेची तस्करी रोखण्यासाठी प्रयत्न सुरू असतात. पोलीस दलातच सीआयडीचा आणखी एक विभाग यासाठी बेळगाव येथे कार्यरत आहे. या विभागातील अधिकारी व कर्मचाऱयांनी लॉकडाऊनच्या काळात तस्करी रोखण्यासाठी मोठी मेहनत घेतली आहे.
प्रतिनिधी / बेळगाव
बेळगावसह सहा जिल्हय़ांचे कार्यक्षेत्र सीआयडी, अरण्य फिरत्या पथकाकडे आहे. केवळ सव्वा वर्षात या विभागात पोलीस उपनिरीक्षक म्हणून सेवा बजावणाऱया धडाडीच्या अधिकारी रोहिणी पाटील यांनी अनेक तस्करांचे कंबरडे मोडले आहे. कासव, घुबड, दुतोंडी साप, सांबर, हरिणांची शिंगे, वाघनखे, हस्तिदंत, सरडा, तितरांची तस्करी रोखण्याबरोबरच चंदन, रक्तचंदन व सागवानी नाटांची गैरमार्गाने विक्री करणाऱया टोळय़ावरही त्यांनी जरब बसविली आहे.
लॉकडाऊनच्या काळात वन्यप्राण्यांची व त्यांच्या अवयवांची तस्करी रोखण्यात त्यांनी मोठी कामगिरी बजावली आहे. गेल्या वषी वन्यजीवी संरक्षण कायद्यांतर्गत 13 गुन्हे दाखल करून सोळा जणांना अटक केली आहे तर अरण्य कायद्यांतर्गत 16 गुन्हे दाखल करून त्यांच्याकडून वनसंपदा जप्त केली आहे. 21 लाख 96 हजारांची वाहनेही या पथकाने ताब्यात घेतली आहेत.
चालू वषी जुलैअखेरपर्यंत वन्यजीवी संरक्षण कायद्यांतर्गत पाच गुन्हे दाखल करून नऊजणांना अटक करण्यात आली आहे. तर अरण्य संरक्षण कायद्यांतर्गत चंदनतस्करीची तीन प्रकरणे उघडकीस आणून अडीच लाखांचे चंदन हस्तगत केले आहे. केवळ वनखात्याकडून वन्यजीवी संरक्षण असो किंवा तस्करी प्रकरणे असोत हाताळणे शक्मय होत नाही. म्हणून राज्य सरकारने सीआयडीमध्ये यासाठी अरण्य फिरते पथक स्थापन केले आहे.
केवळ कारवाई करणे इतकेच नव्हे तर शाळा-कॉलेजना भेटी देऊन याविषयी जागृती करण्याची जबाबदारीही या पथकावर असून रोहिणी पाटील व त्यांच्या सहकाऱयांनी ही जबाबदारीही पार पाडली आहे. गेल्या एक-दीड वर्षात जास्तीत जास्त कासव, दुतोंडी साप, घुबड आदींची विक्री प्रकरणे उघडकीस आली आहेत. याला भोंदू ज्योतिषांचा सल्ला कारणीभूत आहे.
‘घरात लक्ष्मी टिकायची असेल तर घुबड पाळा’, ‘दुतोंडी साप बाळगा’, ‘कासव आणा’, असे सल्ले दिले जातात. त्यामुळे साहजीकच या वन्यजीवांची मागणी वाढते. खरेदी करणारे वाढले की विक्री करणारेही त्यासाठी तयार असतात. जंगलात फिरून घुबड पकडण्यात येते. दुतोंडी साप ताब्यात घेतले जातात. कासवाचीही विक्री होते. अशी प्रकरणे रोखण्यासाठी बेळगाव, बागलकोटसह अनेक जिल्हय़ात या पथकाने कारवाई केली आहे.
काही जण हरिणांची शिकार केल्यानंतर वर्षांनुवर्षे त्याची शिंगे आपल्या घरात ठेवतात. आर्थिक अडचणी भागविण्यासाठी त्याची विक्री करण्यासाठी तयार होतात. अशा प्रकरणातील आरोपींनाही रोहिणी पाटील यांनी गजाआड केले आहे. ‘हातजोडी’ या वनस्पतीला मोठी मागणी आहे. ज्यांच्याजवळ हातजोडी असते त्यांची भरभराट होते, या समजामुळे हातजोडी खरेदीसाठी अनेक जण तयार होतात. ही दुर्मीळ वनस्पती मिळत नाही. सरडय़ाचे अवयव हुबेहूब हातजोडीसारखेच दिसतात म्हणून त्याची तस्करी अलीकडे वाढली होती. 30 जुलै रोजी निपाणीजवळ कोल्हापूर येथील एका युवकाला अटक करून सरडय़ाचे 25 अवयव जप्त करण्यात आले.
महाराष्ट्र-कर्नाटकच्या सीमेवरील गावात मोठय़ा प्रमाणात वन्यप्राण्यांच्या अवयवांची तस्करी चालते. म्हणून सीआयडी अरण्य विभागाने या गावांवर आपले लक्ष्य केंद्रित केले आहे. काही जण अवयवांच्या तस्करीसाठी प्राण्यांची शिकार करतात तर आणखी काही जण जिभेचे चोचले पुरविण्यासाठी शिकारीला जातात. या शिकारीमध्ये ससे, हरिण, घोरपड, मोर, रानडुक्कर, भेकर, रानमांजर (बावगा) यांचा प्रामुख्याने समावेश असतो. तर घुबड, दुतोंडी साप, कासव यांची पैसा कमावण्यासाठी तस्करी केली जाते.
तस्करांवर नजर ठेवून त्यांच्यावर कारवाई करताना अनेक अडचणी येतात. अपुऱया साधनसुविधा, सहा जिल्हय़ांचे कार्यक्षेत्र, अपुरे मनुष्यबळ असूनही या विभागाने गेल्या एक-दीड वर्षांत तस्करी रोखण्यासाठी मोठी कामगिरी बजावली आहे. वन्यप्राण्यांची तस्करी करणारे स्वतःचा बचाव करण्यासाठी कोणत्याही थराला जातात. आपल्यावर छापा टाकण्यासाठी अधिकारी येत असल्याचा सुगावा लागताच ते अक्षरशः शस्त्रसज्ज होतात. याचेच एक उदाहरण म्हणजे बेळगाव जिल्हय़ाशेजारील गडहिंग्लज येथील एका तस्कर टोळीने आपल्याला अटक करायला आलेल्या महाराष्ट्रातील अरण्य विभागातील अधिकाऱयाचा तब्बल 15 किलोमीटर आपल्या आलिशान मोटारीने पाठलाग केला. त्यानंतर वन खात्याच्या वाहनाला जोराची ठोकर देऊन वन कर्मचारी व अधिकारी यांना बेदम मारहाण केली. यावरून या तस्करांची मजल कोठवर जाते, याची कल्पना येते. जंगलातील तस्करी रोखण्यासाठी वनखाते असतेच. वनसंपत्ती काँक्रिटच्या जंगलात आणून याची विक्री करणाऱया टोळीच्या मुसक्मया आवळण्यासाठी सीआयडी अरण्य विभागाने कंबर कसली आहे.