लॉकअप डेथ प्रकरणी तपासाला गती : कुटुंबीय आज बेळगावात येणार
प्रतिनिधी /बेळगाव
लॉकअप डेथ प्रकरण सीआयडीकडे देण्यात आले आहे. सीआयडीने या प्रकरणाच्या तपासाला जोरदार सुरुवात केली आहे. तपासानंतर खरोखरच दोषी असलेल्यांवर कारवाई होणार का? याबाबत पहावे लागणार आहे. तीन दिवसांपासून तळ ठोकून राहिलेल्या पथकाने बुधवारी बेल्लद बागेवाडी येथे जाऊन कुटुंबीयांची भेट घेतली आहे. त्यांना गुरुवारी बेळगावात बोलाविले आहे. त्यानंतर त्यांची चौकशी होणार आहे.
बेल्लद बागेवाडी येथील बसनगौडा पाटील (वय 45) यांचा शुक्रवार दि. 11 रोजी लॉकअपमध्ये मृत्यू झाला होता. त्यानंतर मोठी खळबळ उडाली होती. मयत बसनगौडा यांच्या कुटुंबीयांनी पोलिसांच्या त्रासामुळेच आपल्या व्यक्तीचा मृत्यू झाल्याचा आरोप केला आहे. त्यानंतर हे प्रकरण सीआयडीकडे सोपविण्यात आले. सीआयडी पथक तीन दिवसांपूर्वी बेळगावात दाखल झाले. त्यानंतर त्यांनी संपूर्ण चौकशीला सुरुवात केली. चौकशीदरम्यान काही गोष्टी गुपीत ठेवण्यात आल्या आहेत. सीसीटीव्ही कॅमेरे बंद होते, असे सांगण्यात आले आहे. त्यामुळे पुन्हा गडद संशय निर्माण झाला आहे.
कुटुंबावरदेखील दबाव घालण्याची शक्यता
पोलीस स्थानकामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. मात्र ते बंद कसे झाले? असा प्रश्न आता साऱयांनाच पडला आहे. एकूणच हे प्रकरण दडपण्याचा प्रत्न सुरू असल्याचा आरोप बेळगाव जिल्हय़ातील जनतेतून होत आहे. सीआयडीकडे हे प्रकरण सोपविण्यात आले आहे. आता सीआयडीचे अधिकारी योग्य तपास करून कुटुंबीयांना न्याय देणार का? याकडे साऱयांचेच लक्ष लागले आहे. कुटुंबावरदेखील दबाव घालण्याची शक्मयता व्यक्त होत आहे. त्यामुळे हे प्रकरण सीआयडी पथक कशाप्रकारे हाताळणार याकडे पहावे लागणार आहे.
बुधवारी सीआयडी पथक बेल्लद बागेवाडी येथे दाखल झाले. त्यांनी कुटुंबीयांची भेट घेतली. त्यावेळी कुटुंबीयांनी घडलेल्या घटनेची माहिती दिली आहे. आता गुरुवारी त्यांची जबानी घेतली जाणार आहे. त्यानंतरच प्रकरणाचा उलगडा होण्याची शक्मयता आहे. बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकाबद्दल अनेक तक्रारी झाल्या आहेत. निष्पापांना नाहक त्रास दिल्याचे आरोप अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी केला आहे. याबाबत लवकरच वरि÷ पोलीस अधिकारी तसेच जिल्हाधिकाऱयांना निवेदन देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.