प्रतिनिधी /मडगांव
किनारी क्षेत्र व्यवस्थापन आराखडा वर गुरुवारी जनसुनावणी घेण्यात आली होते. सदर जनसुनावणी मडगावच्या एसजीपीडीए मार्केटमध्ये मध्यरात्री रात्री 2 वाजल्यानंतर संपवण्यात आली. कोविड 19 च्या महामारीमूळे सरकारने राज्यात कर्फ्यू जारी केल्याने गुरुवारी जनसुनावणीसाठी आलेल्या लोकांनी 6 वाजल्यानंतर घरी जाण्यास सुरुवात केली. तसेच सदर जनसुनावणी शुक्रवारी सकाळी 10 वा. पुन्हा सुरुवात करण्याची विनंती लोकांनी केली होती. पण प्रशासकीय अधीकाऱयांनी त्यांचे म्हणणे ऐकून घेतले नाही. त्यामुळे गोंयकारांचो एकवोटचे निमंत्रक अभिजीत प्रभुदेसाई यांच्यावतीने शुक्रवारी दक्षिण गोवा जिल्हाधीकारी रुचिका खटियाल यांना निवेदन देऊन सदर जनसुनावणी रद्द करण्याची मागणी केलेली आहे. तसेच त्या निवेदनमध्ये कायद्याच्या दृष्टीकोनातून ही जनसुनावणी का रद्द करण्यात यावी यासाठी अनेक मुद्दे यात नमूद केले असल्याचे ‘गोंयकारांचो एकवट’चे निमंत्रक अभिजीत प्रभुदेसाई यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगीतले.
जिल्हाधीकाऱयांनी सदर जनसुनावणी घेताना कोणताही अभ्यास न करता घेतलेली आहे. त्यांनी कायद्यांच्या नियमांचे पालन करुन ही जनसुनावणी घ्यायला हवी होती. यात सहभागी झालेल्या प्रत्येक नागरिकाला बोलण्याची संधी मिळायला हवी होती.राज्य सरकारला जनतेचे काहिच पडून गेलेले नाही. तसेच सरकारी अधीकारी सुद्धा सरकारच्या आदेशानुसार काम करत आहे. तसेच गोयकारांचो एकवटतर्फे सादर केलेले निवेदन पर्यावरण संचालकाला पाठवण्यात येणार आहे असे जिल्हाधीकारी रुचिका खटियाल यांच्यातर्फे कळवण्यात आल्याचे निमंत्रक प्रभुदेसाई यांनी सांगीतले.