मुलींचीच चमक : कोरोनामुळे गुणवत्ता यादी नाही
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) बुधवारी बारावीपाठोपाठ दहावीचा निकालही जाहीर केला. देशात 91.46 टक्के इतका निकाल लागला असून यंदाही विद्यार्थिनींनीच चमक दाखवल्याचे दिसून येत आहे. गेल्या वषीच्या तुलनेत यावषी निकालात थोडी सुधारणा झाली असली तरी 90 किंवा 95 टक्क्यांहून अधिक गुण मिळविणाऱया विद्यार्थ्यांचे प्रमाण घटल्याची माहिती मंडळाकडून देण्यात आली. निकालात यंदा त्रिवेंद्रम विभागाने (99.28 टक्के) बाजी मारली असून चेन्नई दुसऱया (98.95 टक्के) आणि बेंगळूर विभाग तिसऱया स्थानी (98.23 टक्के) राहिला आहे. पुणे विभाग 98.05 टक्के निकालासहित चौथ्या तर पाचव्या स्थानावर अजमेर (96.93 टक्के निकाल) विभाग आहे. स्थानावर आहे. महाराष्ट्राचा निकाल 98.5 टक्के लागला आहे.
केंद्रीय मुनष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी बुधवारी निकाल जाहीर होईल अशी घोषणा केली होती. त्यानुसार दुपारी ऑनलाईन पद्धतीने निकाल जाहीर करण्यात आला. कोरोना संसर्गामुळे यंदा गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली नाही. यंदा 18 लाख 85 हजार 885 विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यातील 18 लाख 73 हजार 15 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी 17 लाख 13 हजार 121 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. उत्तीर्णांमध्ये मुलींचे प्रमाण 93.31 तर मुलांचे प्रमाण 90.14 टक्के इतके आहे. 1 लाख 84 हजार विद्यार्थ्यांनी 90 टक्केहून अधिक गुण मिळविले आहेत. तर, 41 हजारहून अधिक विद्यार्थ्यांनी 95 टक्केहून अधिक गुण संपादन केले.