प्रतिनिधी/ मुंबई
महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नाविषयी खटला सर्वेच्च न्यायालयात प्रलंबित आहे. या खटल्याच्या सुनावणीच्यावेळी पेंद्र शासनाने तटस्थतेची भूमिका घेणे आवश्यक आहे. त्यासाठी राज्यातील सर्वपक्षीय खासदारांसह पंतप्रधान मोदी यांची भेट घेणार असल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी विधान परिषदेत दिली. महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नाविषयी सर्वपक्षीय आमदारांनी उपस्थित केलेल्या तारांकित प्रश्नावर उत्तर देताना मुख्यमंत्री ठाकरे बोलत होते.
यावेळी दिलेल्या लेखी उत्तरात खटल्यामध्ये राज्याची बाजू प्रभावीपणे मांडण्यासाठी वरिष्ठ विधीज्ञ हरिश साळवे, के. परासरन, राकेश द्विवेदी, राजू रामचंद्रन, अरविंद दातार यांची विशेष समुपदेशी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. याविषयी ‘कोर्ट कमिश्नर’ यांच्यापुढे साक्षी पुरावे सादर करण्यासाठी तज्ञ साक्षीदारांची शपथपत्रे सिद्ध करण्याची कार्यवाही सुरू असल्याचेही यावेळी मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
Trending
- माजी केंद्रीय गृहमंत्र्यांच्या सूनबाई उद्या भाजपा प्रवेश? शिवराज पाटील- चाकुरकरांच्या सूनबाई डॉ. अर्चनाताई पाटील भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चा
- शाहू महाराजांचा सन्मानच राखायचा होता तर त्यांना राज्यसभेवर का पाठवलं नाही ? संजय मंडलिकांचा महाविकास आघाडीला सवाल
- कुख्यात गँगस्टर मुख्तार अन्सारीचा तुरुंगात मृत्यू, उत्तरप्रदेश पोलीस अलर्ट मोडवर!
- बेकायदेशीर कत्तलखान्यावर छापा; ५० पेक्षा जास्त जनावरांची सुटका
- अवैध दारू विक्रेत्याला सीसीबी पोलिसांनी केली अटक
- कणकुंबी तपासणी नाक्यावर 7 लाख 98 हजार रोख रक्कम जप्त
- हरमलात पावणे दोन कोटीचे ‘मॅजिक मशरुम्स’ जप्त
- चारही जणांची दहा तास चौकशी