ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
सीमारेषेच्या पलीकडे असलेल्या लाँचपॅडवरून 250 ते 300 दहशतवादी भारतात घुसखोरी करण्याच्या प्रयत्नात असल्याची माहिती मेजर जनरल विरेंद्र वत्स यांनी दिली.
आज सकाळी जम्मू-काश्मीरच्या नौगाम सेक्टरमधील नियंत्रण रेषेवरून करण्याच्या प्रयत्नात असलेल्या दोन दहशतवाद्यांचा सुरक्षा दलाच्या जवानांनी खात्मा केला. त्यानंतर लष्कराने पत्रकार परिषद घेऊन अजूनही 250-300 दहशतवादी सीमारेषेवरून घुसखोरी करण्याच्या तयारीत असल्याची माहिती दिली.
नौगाम सेक्टरमध्ये नियंत्रण रेषा ओलांडून भारतात घुसखोरी करण्याच्या प्रयत्नात असलेल्या दोन दहशतवाद्यांचा सुरक्षा दलाने खात्मा केला.दहशतवाद्यांकडील दोन एके -47, 12 भरलेली मॅगझीन, एक पिस्तूल आणि ग्रेनेड जप्त करण्यात आले आहे. तसेच भारतीय आणि पाकिस्तानी चलनाच्या अंदाजे 1.50 लाख रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.