बेळगाव / प्रतिनिधी :
म. ए. समितीचे निष्ठावंत कार्यकर्ते, हलगा ग्राम पंचायतीचे माजी अध्यक्ष आणि सीमा सत्याग्रही रामचंद्र भैरू हणमंताचे (वय 96) रा. लक्ष्मी गल्ली, हलगा यांचे बुधवार दि. 3 रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. म. ए. समितीच्या प्रत्येक आंदोलनामध्ये त्यांनी सहभाग घेतला होता. समितीशी एकनि÷ राहून सीमाप्रश्न सोडविण्यासाठी त्यांची तळमळ होती. ते देवस्थान पंच कमिटीचे अध्यक्ष व प्रगतशील शेतकरी होते. त्यांच्या पश्चात पत्नी, चार मुलगे, दोन मुली, सुना, जावई, नातवंडे, पणतवंडे असा परिवार आहे.