आरटीपीसीआर सक्ती मागे : वाहतूक सुरळीत झाल्याने प्रवाशांना दिलासा
प्रतिनिधी /बेळगाव
कोरोनाला थोपविण्यासाठी सीमाहद्दीवर उभारण्यात आलेल्या चेकपोस्ट नाक्मयांवरील आरटीपीसीआर सक्ती मागे घेण्यात आल्याने चेकपोस्टवरून वाहने सुसाट धावताना दिसत आहेत. शिवाय कर्नाटक-महाराष्ट्र असा प्रवास करणाऱया प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.
कोरोनाच्या पहिल्या लाटेदरम्यान सीमाहद्दीवर चेकपोस्ट नाके उभारण्यात आले होते. या नाक्मयांवर प्रवाशांची चौकशी व तपासणी केली जात होती. पहिल्या लाटेदरम्यान अनेक संपर्क रस्त्यांवर झाडांचे ओंडके टाकून रस्ते बंद करण्यात आले होते. तसेच दुसऱया लाटेदरम्यानदेखील सीमाहद्दीवर प्रवाशांची कसून चौकशी केली जात होती. मात्र आता कोरोनाचा प्रादुर्भाव काही प्रमाणात कमी झाल्याने आरटीपीसीआर अहवाल सक्ती मागे घेण्यात आल्यामुळे सीमाहद्दीवरील चेकपोस्ट नाक्मयांवर शिथिलता देण्यात आली आहे. त्यामुळे कर्नाटक-महाराष्ट्र प्रवास सोयीस्कर झाला आहे.
सीमाहद्दीवरील शिनोळी, राकसकोप, अतिवाड फाटा, चलवेनहट्टी क्रॉस यासह इतर ठिकाणी चेकपोस्ट नाके सुरू होते. त्यामुळे ग्रामीण भागातदेखील ये-जा करताना अडचणींचा सामना करावा लागत होता. विशेषतः प्रवाशांची मोठी गैरसोय निर्माण व्हायची. दरम्यान वडाप वाहतूकही थांबल्याने सर्वसामान्य नागरिकांबरोबर रुग्णांची हेळसांड झाली होती. मात्र आता या चेकपोस्ट नाक्मयांवर शिथिलता देण्यात आल्याने सीमाहद्दीवरून वाहतूक सुरळीत सुरू झाली आहे.
शासनाने रस्त्यांसह विमान आणि रेल्वेमार्गावरील आरटीपीसीआर सक्तीत सूट दिल्याने सर्वच वाहतुकीची साधने सुरळीत सुरू झाली आहेत. विशेषतः महाराष्ट्र आणि गोवा राज्यातून बेळगावात येणाऱया प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. बेळगाव जिल्हा सीमाहद्दीत असल्याने कर्नाटक-महाराष्ट्र असा प्रवास करणाऱया प्रवाशांची संख्या अधिक आहे. मात्र चेकपोस्ट नाक्मयांवर आरटीपीसीआरची सक्ती करण्यात आल्याने अनेकांचे हाल झाले. मात्र आता आरटीपीसीआर मागे घेण्यात आल्याने सर्वच महामार्गावरून आंतरराज्य प्रवासासाठी वाहने सुसाट धावत आहेत.