ऑनलाईन टीम / लडाख :
पूर्व लडाखमधील भारत-चीन सीमेवर रात्रीच्या वेळी लक्ष ठेवण्यासाठी भारतीय वायुदलाने ‘अपाचे’ हेलिकॉप्टर तैनात केले आहे.
गलवान खोऱ्यातील हिंसक संघर्षानंतर दोन्ही देशांकडून सीमा भागात सैन्य आणि युद्धसामग्री जमवण्यात आली आहे. मागील आठवड्यात दोन्ही देशांच्या लष्कराची विमानेही या भागात घिरट्या घालत होती. दोन्ही देश सीमावादावर चर्चेतून तोडगा काढत आहेत. दरम्यान, कालच चीनने आपले सैन्य 2 किमी मागे घेतले.
मात्र, धोकादायक चीनवर विश्वास न ठेवता भारताने अजूनही युद्धसज्जता ठेवली आहे. 15 जूनच्या रात्री झालेल्या हिंसक संघर्षात भारताचे 20 जवान शहीद झाले होते. त्यामुळे रात्रीच्या वेळी चीनच्या हलचालींवर लक्ष ठेवण्यासाठी भारताने अपाचे हेलिकॉप्टर तैनात केले आहे.