नवी दिल्ली
मागील काही वर्षांपासून भारत आपले विविध टप्प्यावरील आंतरराष्ट्रीय पातळीवर संबंध मजबूत करण्यासाठी प्रयत्न करत आहे. याचाच एक भाग म्हणून भारत आता आपली खाद्य सुरक्षा मजबूत करण्यासाठी पावले उचलत आहे. यामध्ये भारताने सीरियामध्ये खाद्य सुरक्षा मजबूत राखण्यासाठी सीरियाला जवळपास दोन हजार टन तांदूळ भेट स्वरुपात दिले आहेत. यातील पहिल्या टप्प्यातील एक हजार टनाची पहिल्या टप्प्यातील फेरी सीरियाला पोहोचली असल्याचे विदेश मंत्रालयाकडून सांगितले आहे. सीरियामधील भारताचे राजदूत हिफजूर रहमान यांनी तेथील स्थानिक प्रशासन मंत्री आणि एका समितीचे प्रमुख हुसैन मुखलौफ यांच्याकडे हा पहिल्या टप्प्यातील तांदूळ सुपूर्द केला आहे. राहिलेले एक हजार टन तांदूळ लवकरच म्हणजे येत्या 18 फेब्रुवारी रोजी सीरियाला पोहोचणार असल्याचे संकेत असून मानवतेच्या दृष्टीकोनातून आपत्कालीन स्थिती सावरण्यासाठी भारताकडे तांदळाची मागणी सीरियाने केली होती. सदरच्या मागणीमधून दोन्ही देशांमध्ये असलेल्या मजबूत संबंधाचे येथे दर्शन होत असल्याचे पहावयास मिळत आहे.