प्रतिनिधी / खेड
तालुक्यातील सुकिवली-किववाडी येथे बागायतीस लागलेल्या आगीत आंबे व काजूची झाडे जळून 1 लाखाची हानी झाल्याचा अंदाज आहे. आगीचे नेमके कारण समजू शकले नाही.
अचानक उडालेल्या ठिणगीने गवताने पेट घेतला. क्षणार्धात आगीने रौद्ररूप धारण करत आंब्याची 5 झाडे व काजू झाडे जळून खाक झाली. आग लागल्याचे समजताच गणेश चाळके, मंगेश चाळके, श्रीकांत चाळके, श्रीराम चाळके, अंकिता चाळके, मानसी चाळके, स्वाती चाळके, शारदा चाळके यांच्यासह इतर ग्रामस्थांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली. एक एकर जमिनीतील सुके गवतही आगीच्या भक्ष्यस्थानी पडले.