अध्याय तेविसावा
भगवंत म्हणाले, इतर कोणत्याही उपायांनी साध्य न होणारा मनोविजय केवळ सद्गुरूंच्या पूर्ण कृपेमुळे साध्य होतो. मनोविजय आपलासा करणारा आत्मज्ञानाने देवाधिदेवच झाला असे समज. आपल्या मनाला जिंकून इहलोकातच जनार्दनाशी एकरूप झाल्याने, तो त्रिभुवनात अत्यंत धन्य होतो. त्याच्या योगाने पृथ्वी पावन होते. त्याचे पूर्वज तारले जातात व कुळाचा उद्धार होतो. मनोजयाने जे अत्यंत समर्थ झालेले असतात, तेथेच सर्वस्वी शांतीचा निवास असतो. माणसाला सुखदुःखांच्या व अन्य विकारांच्या जाणिवा मनामुळे होत असतात. जे मनावर विजय मिळवतात त्यांना आत्मबोधाच्या योगाने सुखदुःखांचे भोवरे न लागताच निघून जातात. मनोजय हा त्रिभुवनात धन्य होय.
ज्याने आपल्या मनाला जिंकले, त्याने मला आपला दास बनविले किंवा एकाएकी विकतच घेतले असे समज.
आनंदस्वरूप अशा मला आनंद होतो. मला नित्यतृप्ताला त्याच्यामुळेच तृप्ती होते. माझी त्याच्या ठिकाणीच वस्ती असते. त्याच्यामुळेच मी त्रिभुवनात बलवान झालो आहे. ‘मी’ आणि ‘तो’ हे नेहमीच माझ्या किंवा त्याच्या बोलण्यात येत असते पण मनोविजय साध्य केलेला साधक माझ्याशी एकरूप झालेला असल्याने मी आणि तो वेगवेगळे आहेत हे बोलणे आमच्यापलीकडे आहे. आमच्या दोघांच्याही अंतःकरणांत आत्मैक्मयामुळे तो म्हणजे मी किंवा मी म्हणजे तो असा विचार असतो.
मनोजयाने एवढा अधिकार प्राप्त होतो. तो मनोजय न करिता इहलोकीच्या सामान्य शत्रूवर जय मिळविल्यामुळे जे गर्वाने फुगतात, त्यांचा जय तात्पुरता असतो. आत्मस्वरूपात सुखदुःख नाही. पण ते देहामध्ये प्रत्यक्ष दिसते. हे सुखदुःख अविचारामुळे रमणीय वाटते व कल्पनेमध्येच भासते. जीवात्मा देह खरोखर माझा असे म्हणून अभिमानाने मस्तकावर घेऊन जन्ममरणादिक भोवऱयात सुखदुःखांचा स्वतःच भोक्ता होतो. जिवात्म्याची ही परिस्थिती पाहून जे आत्मज्ञानी असतात त्यांच्यात गुरूपदेशाने पूर्णपणे तत्त्वज्ञान ठसलेले असल्यामुळे ते जनात किंवा वनात कोठेही राहिले असता कधीही देहाभिमानी होत नाहीत. असे जे आत्मस्वरूपाच्या अनुभवाने शहाणे झालेले पुरुष असतात, त्यांना प्रारब्धाच्या गतीने प्राणिमात्रांनी अनेक प्रकारची सुखदुःखे दिली तरीही त्यांची आत्मस्वरूपस्थिती ढळत नाही. त्यांना प्राणिमात्राच्या ठिकाणी द्वेष उत्पन्न होत नाही व त्यांच्या मनात मुळीच राग येत नाही. त्रिभुवनामध्ये मीच एक भरलेला आहे असे समजून ते निश्चितपणे द्वंद्वरहित असतात. असा मनुष्य संकट पाहून मनामध्ये भय धरीत नाही आणि कोणाला परके समजत नाही. सर्वच आत्मस्वरूप असल्याने तो सर्वांबरोबर आप्तपणानेच वागत असतो. ज्ञाता हा सर्वस्वी भेदरहित असतो. त्याला समविषमभाव व भेद हे असत नाहीत. तो कोणाचे भयही मानत नाही व कोणाचा खेदही करत नाही. तो सदोदित सुखात आणि आत्मानंदातच निमग्न असतो. निंदा किंवा उपद्रव झाला तरी उद्विग्न न होता सर्व सहन करून सुख प्राप्त झाल्याप्रमाणे राहावयाचे, हेच सिद्धाचे मुख्य लक्षण होय आणि साधकांना साधनही तेच होय. इथपर्यंत सांगून झाल्यावर तो शांतीब्रह्म झालेला ब्राह्मण पुढे म्हणाला, प्राचीन महर्षींनी यापूर्वी ज्या परमात्मनि÷sचा आश्रय घेतला आहे, तिचाच आश्रय घेऊन मी भगवंतांच्या चरणकलांच्या सेवेनेच हा अज्ञानरूपी अगाध संसार पार करून जाईन. माझ्या पूर्वपुण्याच्या भाग्योदयाने अद्वैतस्वरूप आत्मनि÷ा माझ्या ठिकाणी उत्पन्न झाली. त्या आत्मनि÷sच्याच आश्रयाने मी द्वंद्वरहित होऊन अनेक प्रकारची लोकांनी मला दिलेली दुःखे सहन करीत आहे.
भेदभावापासून होणारी सुखदुःखे सहन करणे हेच सिद्धाचे मुख्य लक्षण आहे. त्यासाठी सात्विक धैर्य बाळगण्याची गरज आहे. याच्याच योगाने मनोजय होतो. हेच परमार्थाचे श्रे÷ साधन होय. मोठमोठय़ा ऋषींची हीच आत्मनि÷ा होय. विष्णूचे मुख्य भजन ते हेच होय. याच्या योगानेच आत्मनि÷ा साध्य होते. क्रमशः