लॉकडाऊनमुळे बाजारपेठा बंद : खरेदी-विक्री थंडावल्याने व्यापाऱयांकडून फुल मार्केट बंद ठेवण्याचा निर्णय, फुल उत्पादक शेतकरी अडचणीत
प्रतिनिधी / बेळगाव
वाढत्या कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी राज्यात लॉकडाऊन जारी करण्यात आला आहे. याचा फटका सर्वच क्षेत्रांना बसत आहे. मागील काही दिवसांपासून शहारात लॉकडाऊनची अंमलबजावणी सुरू असल्याने याचा फटका शेतीमाल उत्पादकांना बसत आहे. लॉकडाऊनमुळे फुल विक्री थांबल्याने उत्पादकांना व विपेत्यांना मोठा तोटा सहन करावा लागत आहे. त्यामुळे वेगवेगळय़ा प्रकारची फुले शिवारातच सुकताना दिसत आहेत.
लॉकडाऊनमुळे बाजारपेठा बंद आहेत. शिवाय फुल मार्केट देखील बंद ठेवले आहे. त्यामुळे विक्रीस आणलेली फुले रस्त्यावर ओतण्याची वेळ उत्पादकांवर आली आहे. दरम्यान, फुलांची खरेदी-विक्री थंडावल्याने व्यापाऱयांनी फुल मार्केट बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. लॉकडाऊनमुळे सर्वच बाजारपेठा बंद ठेवण्यात आल्या आहेत. शिवाय वाहतूक व्यवस्थेवर मर्यादा आल्या आहेत. परिणामी फुल मार्केटमधील फुलांची आवक कमी झाल्याने फुल मार्केट बंद ठेवण्यात आले आहे. तसेच फुलांची विक्रीच थंडावल्याने फुल उत्पादकांना व विपेत्यांनाही नुकसान सोसावे लागत आहे.
लॉकडाऊनमुळे लग्न सोहळे, धार्मिक कार्यक्रम, जत्रा-यात्रा, व इतर समारंभांवर निर्बंध आले आहेत. शिवाय मंदिरे देखील बंद असल्याने फुलांची पूर्णपणे विक्री थांबली आहे. त्यामुळे फुले विक्रीविना शिवारातच कोमजताना दिसत आहेत. तर काही ठिकाणी फुले शिवारातच पडून असलेली पहायला मिळत आहेत. बाजारपेठा बंद असल्याने फुल विक्रीवर परिणाम झाला असून फुल तोडणी व वाहतुकीचा खर्चही निघत नसल्याचे उत्पादक सांगत आहेत. त्यामुळे तोडणी केलेली फुले रस्त्यावर फेकण्याची वेळ आली
आहे.
गतवषीही हंगामात उत्पादकांना फटका बसला होता. यंदाही एप्रिल व मे महिन्याच्या सिजनमध्येच फुल विक्री थांबली आहे. त्यामुळे यंदाचा देखील सिजन वाया गेला आहे. साधारण मार्च, एप्रिल व मे महिन्यात भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. त्यामुळे या हंगामात मोठय़ा प्रमाणात फुलांची विक्री होत असते. मात्र गतवर्षीपासून कोरोनामुळे उन्हाळी फुल विक्री हंगाम वाया जात आहे. त्यामुळे उत्पादकांसह विपेतेही अडचणीत आले आहेत. वेगवेगळय़ा फुलांचे उत्पादन घेण्यासाठी फुल उत्पादक शेतकऱयांनी मोठय़ा प्रमाणात खर्च केला आहे. मात्र केलेला खर्च वाया गेला आहे. रोपांची लागवड, रासायनिक खत, किटकनाशकाची फवारणी, शेणखत, मजुरी, मशागत याकरिता मोठय़ा प्रमाणात खर्च केला आहे. मात्र फुले बहरात आली असताना लॉकडाऊन जारी केल्याने फुले शिवारातच पडून आहेत. मुख्यमंत्र्यांनी प्रतिहेक्टर 10 हजारांची मदत जाहीर केली होती. तीही बऱयाच शेतकऱयांना मिळाली नाही.
उत्पादनासाठी केलेला खर्च वाया
एक वेगळा प्रयोग म्हणून 10 गुंठय़ात झेंडूच्या फुलांची लागवड केली आहे. फुले देखील बहरून आली आहेत. मात्र फुल मार्केट बंद असल्याने फुलांच्या विक्रीचा प्रश्न निर्माण झाला आहे. विक्रीविना झेंडूची फुले शिवारातच पडून आहेत. त्यामुळे उत्पादनासाठी केलेला खर्च वाया गेला आहे. शिवाय यंदाचा सिजन देखील वाया गेला आहे.
– उदय चंद्रकांत पाटील (झेंडू उत्पादक शेतकरी, सुळगा हिं.)