भात कापणी-मळणीत बळीराजा मग्न
प्रतिनिधी /बेळगाव
मागील चार दिवसांपासून वातावरणात बदल होऊन ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. सुगी हंगामात व्यत्यय निर्माण झाल्याने शेतकऱयांची चिंता वाढली आहे. बटाटा, रताळी आणि भुईमूग काढणीबरोबर भात कापणीची कामे हाती घेण्यात आली होती. मात्र, अधुनमधून ढगाळ वातावरण निर्माण होत असल्याने सुगी हंगामात अडथळा निर्माण होत आहे.
मागील दोन दिवसात काही वेळ सूर्यदर्शन वगळता दिवसभर ढगाळ वातावरण तयार होत आहे. त्यामुळे कापणी केलेले भात जमा करण्यासाठी बळीराजाची धडपड सुरू होती. तालुक्मयातील कुदेमनी, कल्लेहोळ, बाची, उचगाव, अतिवाड, बेकिनकेरे, बसुर्ते, कोनेवाडी, बेळगुंदी, बेळवट्टी, बडस, बाकनूर, बिजगर्णी, कावळेवाडी, सोनोली, राकसकोप, कडोली, मण्णीकेरी, केदनूर, बंबरगे, देवगिरी आदी भागात भात कापणीची कामे सुरू आहेत. मात्र अधुनमधून ढगाळ वातावरण निर्माण होत असल्याने सुगी हंगाम लांबणीवर पडत आहे. अलीकडच्या काही वर्षात बटाटा लागवडीचे क्षेत्र कमी झाले आहे. त्यामुळे भात लागवडीच्या क्षेत्रात काही प्रमाणात वाढ झाली आहे. शेतकऱयांनी दोडगा, बासमती या पारंपरिक भात जातीबरोबर इंदायणी, सोनम, शुभांगी, अमन या सुधारित भातजातीची लागवड केली आहे. ही सर्व पिके कापणीला आली आहेत. मात्र वातावरणात सातत्याने बदल होत असल्याने सुगी हंगामात व्यत्यय येत आहे.
भात कापणी केलेल्या शेतकऱयांची धडपड
भात कापणी केलेल्या शेतकऱयांची भात जमवाजमवीसाठी धडपड सुरू आहे. अचानक वातावरणात बदल होत असल्याने कापणीही लांबणीवर पडत आहे. वेळेत सुगी हंगाम संपविण्यासाठी शेतकरी उघडीपीच्या प्रतीक्षेत आहेत.