ढगाळ वातावरणामुळे शेतकऱयांची चिंता कायम : जनावरांना ओल्या चाऱयासाठी मका, ज्वारीच्या पेरणीलाही आला वेग
प्रतिनिधी /बेळगाव
पावसाने विश्रांती घेतल्यानंतर बळीराजा सुगी हंगामाकडे वळला आहे. विशेषतः बटाटा, रताळी, भुईमूग, सोयाबीन आणि भातकापणीला सुरुवात झाली आहे. काही भागात भात कापणीला जोर आला आहे. त्यामुळे शिवारात सुगी हंगामाची लगबग दिसून येत आहे. मात्र अधून मधून ढगाळ वातावरण निर्माण होत असल्याने शेतकऱयांची चिंता कायम आहे. परतीचा पाऊस अधिक प्रमाणात झाल्याने सुगी हंगाम काहीसा लांबणीवर पडला आहे. त्यातच ढगाळ वातावरण निर्माण होत असल्याने चिंता वाढली आहे.
तालुक्मयातील कुदेमनी, बाची, तुरमुरी, कल्लेहोळ, बसुर्ते, बेकिनकेरे, उचगाव, अतिवाड, गोजगा, बेळगुंदी, बडस, बिजगर्णी, बेळवट्टी, बाकनूर, बेनकनहळ्ळी, मंडोळी, सावगाव, हंदिगनूर, म्हाळेनट्टी, बोडकेनहट्टी, मण्णिकेरी, केदनूर, बंबरगे, कडोली, देवगिरी आदी भागात बटाटा, रताळी आणि भुईमूग काढणीला वेग आला आहे. तर काही भागात भात कापणीला सुरुवात झाली आहे. काढणी झालेल्या आणि भात कापणी झालेल्या शिवारात पेरणीची कामे देखील सुरू आहेत. त्यामुळे मका, ज्वारीची मागणी देखील वाढली आहे. विशेषतः काढणी झालेल्या शिवारात जनावरांना ओला चारा म्हणून मका आणि ज्वारीची पेरणी केली जाते. त्यामुळे पेरणीला देखील जोर आला
आहे.
कुजल्याने बटाटा उत्पादनात घट
जमिनीतील कमी झालेला पोत आणि बटाटा कुजू लागल्याने उत्पादनात घट झाली आहे. त्यामुळे अलीकडे बटाटा लागवडीचे क्षेत्र झपाटय़ाने घटले आहे. मात्र रताळी लागवडीचे क्षेत्र झपाटय़ाने वाढले आहे. त्यामुळे यंदा उत्पादनात उच्चांकी वाढ होण्याची शक्यता आहे. रताळय़ाचा टिकून असलेला भाव आणि इतर व्यवस्थापन खर्च कमी असल्याने मोठय़ाप्रमाणात रताळी वेल लागवडीकडे शेतकरी वळले आहेत.
यंदा सुगी हंगाम वेळेत संपविण्यासाठी लगबग
मागील आठवडय़ापासून पावसाने उघडीप दिल्याने सुगी हंगामाला प्रारंभ झाला आहे. मात्र सुरळीत सुगी हंगाम होण्यासाठी पावसाची उघडीप आवश्यक आहे. अधून मधून ढगाळ वातावरण होत असल्याने चिंता वाढत आहे. गतवषी परतीच्या पावसामुळे भातशेतीला फटका बसला होता. त्यामुळे यंदा सुगी हंगाम वेळेत संपविण्यासाठी धडपड सुरू आहे.