सुगी हंगाम तोंडावर, विळय़ांच्या मागणीत वाढ, शेतकऱयांची अवजारे जुवळा-जुवळीसाठी धडपड
बेळगाव / प्रतिनिधी
गेल्या दोन-तीन दिवसांपासून परतीच्या पावसाने उसंत घेतल्याने पुन्हा एकदा बळीराजा सुगी हंगामाकडे वळला आहे. सुगी हंगाम सुरू झाल्याने शेतीसंबंधी लागणाऱया अवजारांची जुळवा-जुळव करताना शेतकरी दिसत आहे. सुगी हंगामासाठी लागणाऱया अवजारांच्या मागणीत वाढ झाली असून लोहार व सुतार बांधवाकडे शेतकऱयांची वर्दळ वाढली आहे. शुगी हंगाम तोंडावर आल्याने शेतकऱयांची लगबग सुरू झाली आहे.
परतीच्या पावसाने शिवारात पाणी साचून पिके धोक्मयात आली आहेत. आधीच जुलै महिन्यात झालेल्या अतिपावसाचा फटका पिकांना बसला होता. सुगी हंगामाच्या तोंडावरच पावसाने धुमाकुळ घातल्याने बटाटे, भुईमूग, रताळी काढणीची कामे लांबणीवर पडली होती. पुन्हा बळीराजा काढणीच्या कामावर सुगी हंगामात गुंतला आहे. विशेष करून तालुक्मयात भात पिकांचे अधिक प्रमाणात उत्पादन घेतले जाते. त्यासाठी विळय़ांची गरज भासते. सुगी हंगामात भात कापणीसाठी विळयांची मोठय़ा गरज असते. त्यामुळे लोहार, सुतार बांधवांकडे नवीन विळे घेण्यासाठी, जुन्या विळय़ांना धार लावून लावण्यासाठी शेतकऱयांची लगबग सुरु झाली आहे.
भात कापणीनंतर जनावरांना चाऱयाची (कराड) कापणी केली जाते. त्यासाठी विळय़ांचा वापर केला जातो. त्यामुळे सुगी हंगामात महत्वपूर्ण भूमिका बजावणाऱया विळय़ांसाठी सुतार बांधवांकडे गर्दी पहायला मिळत आहे. पूर्वी ग्रामीण भागात बारा-बुलतेदार पद्धत पहायला मिळायची. आणि या माध्यमातून शेतकऱयांना लागणाऱया गरजा पुरविल्या जायच्या. त्यामध्ये सुतार, लोहार बांधवाची भूमिका महत्वाची असायची. त्यांच्याकडून शेतीला लागणारी अवजारांची पुर्तता केली जात होती. या बदल्यात त्यांना शेतकरी वर्षाकाठी धान्य देत होते. आजही काही खेडय़ामध्ये ही पध्दत पहायला मिळते.
शेतीकामासाठी आधुनिक यंत्रसामुग्रीचा वापर वाढला असला तरी पारंपारिक अवजारांची मोठय़ा प्रमाणात गरज आहे. यात प्रामुख्याने विळा, कुदळ, फावडा, कुऱहाड, कोयता आदींचा समावेश आहे. ही शेतीची पारंपारिक अवजारे ग्रामीण भागात अजूनही तग धरून असलेली पहायला मिळतात. पूर्वी खळयात मेठ रोऊन बैलाच्या सहाय्याने मळण्या केल्या जायच्या. ती पध्दत आज नामशेष झाली असून बैलांची जागा ट्रक्टरने तर खळय़ाची जागा ताडपत्रीने घेतली आहे.
लोहार व सुतार बांधवांकडून विळा, कोयता, कुदळ, फावडा, नांगरचे फाळ, कुळवाची फास आदी अवजारे तयार करून घेतली जातात. शेती कामासाठी ट्रक्टरचा वापर मोठय़ा प्रमाणात होत असला तरी पारंपारिक अवजारांचा वापर केला जातो. लहान शेतकऱयांना ट्रक्टरचे भाडे परवडत नाही त्यामुळे बैलांच्या सहाय्याने अवजारांचा वापर करून शेतकरी सुगी हंगाम साधतात.
पश्चिम भागातील कुदेमनी, कल्लेहोळ, तुरमुरी, कोनेवाडी, अतिवाड, उचगाव, बेकिनकेरे, बसुर्ते, बाची, गोजगा, मण्णूर यासह हंदिगनूर, भागातील चलवेनहट्टी, मण्णिकेरी, बोडकेनहट्टी, कुरिहाळ, केदनूर, कट्टणभावी आदी भागात बटाटा, रताळी, भूईमुग काढणीबरोबर माळरानावरील भात कापणीला सुरुवात झाली आहे. विळय़ांची किंमत आकारमानानुसार 300 रुपयांपासून 500 रुपयांपर्यंत आहेत. तसेच विळय़ांना धार लावण्यासाठी एका विळय़ाला लोहार 40 ते 50 रुपये दर आकारत आहेत. दराविषयी लोहार बांधवांशी संवाद साधला असता लोखंडच्या दर वाढ झाल्यामुळे विळय़ांची किमंतीत वाढ झाल्याचे सांगितले.
शेतकऱयांना वर्षभर शेतीकामासाठी विविध अवजाराची गरज भासते. शेतात काम असताना ही अवजारे मोडून नादुरुस्त होतात. त्यावेळी लोहार व सुतारांकडून ती दुरुस्त करून घेतली जातात. पुन्हा शेतात वापरली जातात. सध्या पावसामुळे सुगी हंगाम लांबणीवर पडत असले तरी शेतकरी अवजाराची जुळवा-जुळव करताना दिसत आहेत. लोहारांकडे जाऊन अवजाराची तयारी करताना दिसत आहेत. पावसाने उसंत दिल्यास सुगी हंगामाला जोर येणार आहे. खरीप हंगातील सुगी हंगाम साधण्यासाठी उघडीपीची गरज आहे.