खाण-खनिज कायद्यात सुधारणा – रोजगारनिर्मिती वाढण्याचा दावा
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
खाण व खनिज (विकास आणि नियमन) कायद्यात सुधारणा करणारे विधेयक शुक्रवारी लोकसभेत मंजूर झाले या बदलांमुळे रोजगाराच्या संधी निर्माण होतील आणि खाण क्षेत्रात नव्या तंत्रज्ञानासह खासगी क्षेत्राला अनुमती मिळेल, असा दावा केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी सभागृहात केला.
खाण क्षेत्रातील सुधारणेतून प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे 55 लाख जणांना रोजगार उपलब्ध होणार असल्याचा दावा सरकारच्यावतीने करण्यात आला आहे. तसेच खाणकामांना चालना देण्यासाठी सरकारने खासगी क्षेत्राला खनिज उत्खननात वाढीव तंत्रज्ञानाची परवानगी देण्याची तरतूदही या विधेयकात करण्यात आली आहे. सदर खाण व खनिज विकास (दुरुस्ती) विधेयक, 2021 लोकसभेने मंजूर केले आहे. भारतातही मोठय़ा प्रमाणात खनिजसंपत्ती उपलब्ध आहे. दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियाप्रमाणेच भारताची क्षमताही मोठी आहे. तरीही सोने किंवा कोळसा या खनिजांसाठी भारताला दुसऱया देशांवर अवलंबून रहावे लागते, असे केंद्रीय मंत्री जोशी यांनी सभागृहात स्पष्ट केले. सध्या देशाच्या जीडीपीमध्ये 1.75 टक्के इतके खाण क्षेत्राचे योगदान आहे सुधारित विधेयकाला मंजुरी मिळाल्यास हे योगदान 2.25 टक्क्मयांपर्यंत वाढेल आणि अर्थव्यवस्था बळकट होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.