नवी दिल्ली \ ऑनलाईन टीम
सुपरस्टार रजनीकांत यांच्या राजकारण प्रवेशावरुन चांगल्याच चर्चा रंगत आहे. मात्र या सर्व चर्चांना रजनीकांत यांनी पूर्णविराम दिला आहे. राजकारणात येण्याचा आपला कसलाही विचार नाही, असं त्यांनी या स्टेटमेंटमध्ये म्हटलं आहे.तसंच आपली रजनी मक्कल मंद्रम ही संघटनाही बरखास्त करण्याचा निर्णय घेतला आहे.
रजनी मक्कल मंद्रम या त्यांच्या संघटनेच्या सदस्यांसोबत चर्चा केल्यानंतर त्यांनी हा निर्णय जाहीर केला आहे. भविष्यातही आपला राजकारणात येण्याचा विचार नाही, असं रजनीकांत यांनी या बैठकीनंतर स्पष्ट केलं आहे. तसंच आपली रजनी मक्कल मंद्रम ही संघटनाही बरखास्त करण्याचा निर्णय घेतला आहे.
तसेच रजनी मक्कल मंद्रम ही संघटना रजनीकांत नरपनी मंद्रममध्ये किंवा रजनीकांत यांच्या चाहत्यांसाठीच्या संघटनेत विलीन होईल, असंही त्यांनी सांगितलं आहे.