बाराजण येथील शेतकऱयांनी दूध रस्त्यावर ओतून केला निषेध
प्रतिनिधी / वाळपई
बाराजण येथील सुमुल कंपनीने आठ दिवसांपासून दुधाची उचल बंद केल्यामुळे मोठय़ा प्रमाणात दुधाची नासाडी होत आहे. अनेकवेळा तक्रारी व विनंत्या करूनही सुमुल व्यवस्थापन याकडे दुर्लक्ष करीत आहेत. याबाबत तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. शेकडो लिटर दूध रस्त्यावर ओतून दूध उत्पादकांनी निषेध केला.
दरम्यान, सुमुल कंपनीने एक तर या भागातील दूध संकलन केंद्र बंद करावे, अन्यथा चांगली सेवा द्यावी, अशी मागणी दूध उत्पादक यांनी केलेली आहे. सत्तरी तालुक्मयातील बाराजण या ठिकाणी सुमुल कंपनीचे दूध संकलन केंद्र आहे. गेल्या आठ दिवसांपासून वेगवेगळी कारणे पुढे करून दूध संकलन करण्याचे काम बंद करण्यात आलेले आहे. यामुळे गेल्या आठ दिवसांपासून या भागात दूध उत्पादकांचे मोठय़ा प्रमाणात दुधाचे नुकसान होत आहे. यामुळे संबंधित शेतकऱयांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. याबाबत आज शेतकऱयांनी पत्रकारांशी संवाद साधून व्यथा मांडल्या.
संकलन करणाऱया उडवाउडवीची उत्तरे
बाराजण येथील दूध अडवई येथे नेले जाते; मात्र दूध संकलन करणारी व्यक्ती या भागांमध्ये वेगवेगळी कारणे पुढे करून गेल्या आठ दिवसांपासून याभागात येतच नाही. दूध उत्पादक संबंधित संकलन केंद्रावर येऊन त्यांची प्रतीक्षा असतात. त्यांच्या फोनवर संपर्क साधल्यास उडवाउडवीची उत्तरे दिली जातात. दूध खराब असल्याचे कारण सांगून टाळाटाळ करण्याचा प्रयत्न करतात, असा शेतकऱयांनी केला. दरम्यान मंगळवारी असलेल्या दूध उत्पादकांनी आपले दूध रस्त्यावर ओतून निषेध नोंदविला.
सुमुलकडून आश्वासनांना हरताळ
गेल्या आठ दिवसांपासून विविध कारणे पुढे करून दूध उत्पादकांची गोची केली जात आहे. ज्यावेळी याठिकाणी दूध संकलन केंद्र सुरू केले त्यावेळी मोठमोठी आश्वासने दिली होती. आता मात्र सदर आश्वासनांना हरताळ फासून या भागातील दूध उत्पादकांना कात्रित पकडण्याचा प्रयत्न कंपनीचे व्यवस्थापन करीत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. दूध उत्पादकांची हेळसांड थांबवून कंपनीच्या व्यवस्थापनाने या भागातील संकलन केंद्र बंद करून दूध उत्पादकांची थकबाकी त्वरित द्यावी, अशी मागणी पांडुरंग माळशेकर यांनी केली.