रशियाचा पाठिंबा, इतर सदस्यांशी चर्चा करणार
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
काश्मीर प्रश्नी संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेत चर्चा घडवून आणण्याचा प्रयत्न चीन करीत असतानाच रशियाने भारताला या परिषदेचे स्थायी सदस्यत्व मिळावे अशी भावना व्यक्त केली आहे. रशियाचे विदेश मंत्री लाव्हरोव्ह सध्या भारताच्या दौऱयावर असून त्यांनी विविध मंत्र्यांशी चर्चा केली आहे .
भारत ही एक महत्वाची आर्थिक आणि सामरीक शक्ती आहे. अशा देशाला सुरक्षा परिषदेचे कायमस्वरूपी सदस्यत्व मिळाले पाहिजे. जागतिक शांततेच्या दृष्टीने ते महत्वाचे आहे. सुरक्षा परिषदेचा विस्तार होणे आवश्यक असून त्यात भारतासह आणखी काही देशांचा समावेश केला गेला पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. भारतासंबंधी प्रस्ताव आल्यास आम्ही पाठिंबा देऊ असे ते म्हणाले.