वृत्तसंस्था/ मुंबई :
कोरोना महामारी संकटामुळे जागतिक स्तरावरील क्रिकेट क्षेत्राला फार मोठा फटका बसला आहे. तब्बल तीन महिन्यांच्या कालावधीनंतर इंग्लंडमध्ये बुधवारपासून विंडीज आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेला प्रारंभ केला आहे. दरम्यान, हे सामने प्रेक्षकांविना खेळविले जात आहेत. भारतामध्ये राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेचे भवितव्य सुरक्षिततेवरच अवलंबून राहील, असे प्रतिपादन भारतीय क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष आणि माजी कर्णधार सौरव गांगुलीने केले आहे.
देशातील राष्ट्रीय क्रिकेटवर अनिश्चिततेचे सावट दाट होत असल्याचे पहावयास मिळते. लांबणीवर टाकण्यात आलेली आयपीएल क्रिकेट स्पर्धा कदाचित ऑक्टोबर महिन्यात होऊ शकेल. पण प्रवास सुरक्षित असणे जरुरीचे आहे, असेही तो म्हणाला. प्रत्येक वर्षाच्या क्रिकेट हंगामाला प्रारंभ ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस विजय हजारे करंडक क्रिकेट स्पर्धेने होतो. त्यानंतर दुलिप करंडक आणि सय्यद मुस्ताक अली करंडक क्रिकेट स्पर्धा घेतल्या जातात. गेल्या वषीच्या क्रिकेट हंगामात कोरोना महामारीमुळे देशात अंमलात आणलेल्या लॉकडाऊन समस्येने इराणी करंडक क्रिकेट स्पर्धा रद्द करण्यात आली होती.
कोरोना परिस्थितीमध्ये सुधारणा झाली तर आगामी क्रिकेट हंगाम नियमित वेळेनुसार सुरू होऊ शकेल. पण क्रिकेटपेक्षा खेळाडूंची सुरक्षा महत्त्वाची राहील. राष्ट्रीय क्रिकेट हंगामामध्ये विविध स्पर्धांसाठी क्रिकेटपटूंना एका ठिकाणाहून दुसऱया ठिकाणी प्रवास करावा लागतो. पण सध्याच्या स्थितीत प्रवास करणे धोक्मयाचे होत असल्याने क्रिकेटबद्दल भाकित करता येणे शक्मय नाही, असेही गांगुलीने वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले. भारतामध्ये कोरोनाचा प्रसार वाढत असून गुरुवारी एका दिवसामध्ये 24 हजार 879 व्यक्तींना कोरोनाची बाधा झाल्याचे आढळून आले आहे. देशामध्ये कोरोनाच्या बळींची संख्या 21 हजार 129 झाली आहे. गुरुवारी एका दिवसामध्ये कोरोनाने देशात 487 लोकांचे बळी घेतले आहेत.