पांग्रड, निरुखे गावात तब्बल अकरा दिवसांनी वीज
वार्ताहर / पांग्रड:
पांग्रड व निरुखे या दोन्ही गावांतील वीजपुरवठा तब्बल अकरा दिवसांनी बुधवारी रात्री सुरळीत झाला. यासाठी दोन्ही गावांतील साठ युवकांनी वीज वितरणच्या कर्मचाऱयांना सहकार्य केले.
तौक्ते वादळाचा फटका या दोन्ही गावांना बसला. भडगाव तिठा ते पांग्रडपर्यंत तीस वीज खांब जमीनदोस्त झाले. गेले अकरा दिवस दोन्ही गाव काळोखात होते. सर्वच व्यवहार ठप्प झाले. वीज वितरणचे कर्मचारी आपल्यापरीने वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करीत होते. मात्र, अपुऱया कर्मचारी संख्येमुळे त्याला मर्यादा येत होती. ही बाब लक्षात घेऊन दोन्ही गावांतील साठ युवकांनी वीज वितरणला सहकार्यासाठी पुढाकार घेतला.
पांग्रड-मुंबई ग्रामस्थ मंडळाचे विजय मर्गज यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी हे काम केले. दोन्ही गाव भौगोलिकदृष्टय़ा डोंगराळ असल्याने वीज खांबांची खांद्यावरून वाहतूक करणे तसेच ते उभे करण्यासाठी खड्डे खोदणे आदी कामेही या युवकांनी केली. सलग आठ दिवस हे काम चालले.
वीज वितरणच्या स्थानिक कर्मचाऱयांसह वरिष्ठ अधिकारीही ठाण मांडून होते. यामध्ये अधीक्षक अभियंता विनोद पाटील, कार्यकारी अभियंता रमेश लोकरे, कडावलचे शाखा अभियंता अमिन तारापुरे यांचा समावेश होता. ठेकेदार वेंगुर्लेकर यांच्या टीमनेही मेहनत घेतली. फोरमन कुंभार, लाईनमन जाधव, पणदूरकर, मारुती मेस्त्राr, अंकुश चव्हाण, नरेंद्र चव्हाण यांचाही सहभाग होता. वीजपुरवठा सुरळीत झाल्याने ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.