प्रतिनिधी/ बेळगाव
सुवर्णसौधसाठी लाख मोलाची जमीन दिली. मात्र आता शेतकऱयांनाच सुवर्णसौधच्या बाजुने शेताकडे जाण्यासाठी जाणाऱया रस्त्या अडवून वेठीस धरण्याचा प्रयत्न सुरू झाला. यामुळे हलगा येथील शेतकऱयांतून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत असून तो रस्ता तातडीने खुला करावा, या मागणीसाठी हलगा येथील शेतकऱयांनी जिल्हाधिकाऱयांना निवेदन दिले.
सुवर्णसौधच्या मागील बाजुला तसेच शेजारी हलगा येथील शेतकऱयांच्या जमीनी आहेत. त्या शेताकडे जाण्यासाठी सर्व्हिस रस्ता करुन देण्यात आला होता. तो रस्ता करावा या मागणीसाठी शेतकऱयांनी अनेकवेळा आंदोलने केली. त्या रस्त्यावरुन दररोज शेतकरी ये-जा करत असतात. मात्र आता त्या रस्त्यावर लोखंडी खांबांचे कुंपण घालण्यात येत आहे. त्यामुळे शेतीकडे जाणे अवघड बनले आहे. तेंव्हा तातडीने तो रस्ता खुला करावा, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली.
सुवर्णसौधसाठी हलगा येथील शेतकऱयांच्या जमीनी विनवणी करुन काढुन घेण्यात आल्या. शेतकऱयांनीही माणुसकी म्हणून आपल्या जमीनी दिल्या. मात्र आता शेतकऱयांनाच अडचणीत आणण्याचा प्रयत्न सुवर्णसौधचे अधिकारी करत आहेत. ये-जा करणाऱया रस्त्यावरच जर कुंपण घातले तर शेतकऱयांनी शेताकडे जायचे कसे? असा प्रश्न देखील उपस्थित करण्यात आला.
महसुल अधिकारी एस. एम. परगी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी ऍड. आण्णासाहेब घोरपडे, ऍड. वाय. के. दिवटे, ऍड. सुभाष मुतगेकर, ऍड. बी. पी. जेवणी, ऍड. नलवडे, ऍड. कांबळे, ऍड. शरद देसाई, रामा कामण्णाचे, बाहुबली चिक्कपराप्पा, कृष्णा हणमंताचे, झंजाप्पा चौगुले, यल्लाप्पा बिळगोजी, शिवाजी सामजी, विजय निलजकर, वामन सामजी, ऍड. परशराम भंडारी, वामन सामजी यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.