प्रतिनिधी/ बेळगाव
राणी मल्लम्मा या शूरवीर महिलेने 16 व्या शतकात महिलांच सैन्याची तुकडी तयार केली होती. त्यांचे काम मोठे आहे. बेळवडी (ता. बैलहोंगल) येथील या शूरवीर महिलेने अनेक लढाया लढल्या आहेत. त्यामुळे सुवर्णसौध येथे राणी बेळवडी मल्लम्मा यांचा भव्य पुतळा उभा करावा, अशी मागणी राणी मल्लम्मा अभिमानी संघाच्यावतीने जिल्हाधिकाऱयांकडे निवेदनाव्दारे करण्यात आले.
राणी मल्लम्मा यांनी महिलांच्या अन्यायाविरोधात लढा दिला. इंग्रजांच्या बरोबर लढा दिला. याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्याबरोबरही झुंज दिली आहे. अशा या शूर महिलेचा सुवर्णसौध परिसरात पुतळय़ाची उभारणी करणे महत्वाचे असून तातडीने याबाबत निर्णय घ्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
यावेळी संघटनेचे अध्यक्ष आर. बी. पाटील, ऍड. सी. एस. चिक्कनगौडर, वाय. आर. पाटील, प्रकाश हुंबी, बसवराज बेळ्ळीगेर, विरेश पाटील, गिरीमल्लय्या होसमठ यांच्यासह संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.