गृहमंत्री अनिल देशमुख : मुंबई पोलिसांनी चांगले काम केल्याचा निर्वाळा
प्रतिनिधी/ मुंबई
अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यूप्रकरणाचा तपास करण्यासाठी सरकारने सीबीआयची नियुक्ती केली. पण आता तो विषय मागे पडल्याचे दिसते. तरीही सुशांतसिंह राजपूत प्रकरणाचा सखोल तपास व्हावा, अशी अपेक्षा राज्याचे गफहमंत्री अनिल देशमुख यांनी सोमवारी एका वफत्तवाहिनीच्या कार्यक्रमात बोलताना व्यक्त केली.
सुशांतसिंहप्रकरणी मुंबई पोलिसांनी एफआयआर का दाखल केला नाही असा प्रश्न वारंवार उपस्थित केला जात आहे. याबद्दल बोलताना देशमुख म्हणाले, सुशांतसिंह राजपूतचे वडील आणि त्याचे संपूर्ण कुटुंब मुंबईत आले तेव्हा त्यांनी सुशांतसिंहची आत्महत्या आहे आणि आमचा कोणावरही संशय नाही असे लेखी दिले होते. त्यामुळे एफआयआर कोणावर दाखल करायचा, असा प्रश्न होता. या प्रकरणात मुंबई पोलिसांनी चांगला तपास केल्याचा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने दिल्याचे गफहमंत्र्यांनी सांगितले.
प्रत्येक गोष्टीत राजकारण करायचे काही मंडळींनी ठरवले आहे, असा टोलाही त्यांनी विरोधकांना लगावला. सुशांतसिंह राजपूत प्रकरणामुळे अनेक गोष्टी समोर येत आहेत. त्यामुळे योग्य ती चौकशी होईल, असेही देशमुख म्हणाले.