ऑनलाईन टीम / मुंबई :
अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्यात यावा असा निकाल सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी दिला. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते पार्थ पवार यांनी अवघ्या दोन शब्दात प्रतिक्रिया दिली आहे. पार्थ पवार यांनी ‘सत्यमेव जयते!’ असे सूचक ट्वीट केले आहे.
दरम्यान, पार्थ पवार यांनी काही दिवसांपूर्वीच राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना सुशांत सिंह राजपूत प्रकरणात सीबीआय चौकशीची मागणी केली होती.
त्यावर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा आणि पार्थ पवार यांचे आजोबा शरद पवार यांनी पार्थ पवार यांच्या बोलण्याला आपण कवडचीही किंमत देत नाही, अशी प्रक्रिया देखील दिली होती. त्यावरून राजकीय वातावरण ढवळून निघाले होते. त्यानंतर आता पार्थ पवार यांनी ‘सत्यमेव जयते!’ असे ट्वीट केलं आहे.
दरम्यान, ‘सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्ये प्रकरणी योग्य चौकशी व्हावी अशी भावना संपूर्ण देश आणि विशेषत: तरुणांची आहे. त्यामुळे याप्रकरणी सीबीआय चौकशी सुरू करण्यात यावी, अशी मागणी पार्थ पवार यांनी गृहमंत्र्यांकडे केली होती.