आमदार वैभव नाईक यांचे वेधले लक्ष
प्रतिनिधी / कुडाळ:
सार्वजनिक बांधकाम विभाग व जि. प. मार्फत अनियमितपणे कामे आरक्षित करून एका विशिष्ट गटाला कामे मिळवून देण्याच्या हेतूमुळे कुडाळ तालुक्मयातील व संपूर्ण जिल्हय़ातील सुशिक्षित बेरोजगार अभियंता-कंत्राटदार यांच्यावर अन्याय होत आहे. याबाबत कुडाळ तालुक्मयातील सुशिक्षित बेरोजगार अभियंता-कंत्राटदार यांनी आमदार वैभव नाईक यांची कुडाळ शिवसेना शाखेत भेट घेऊन हा अन्याय दूर करण्याची मागणी निवेदनाद्वारे केली. त्यावर नाईक यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या निदर्शनास हा विषय आणून न्याय मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले.
निवेदनात म्हटले आहे, मागील वर्षापासून सार्वजनिक बांधकाम विभाग, जि. प. (बांधकाम विभाग, जलसंधारण विभाग, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग) यांच्यामार्फत होणाऱया 30 लाख / 15 लाखापर्यंतच्या कामांच्या ऑनलाईन निविदा प्रणालीत अनियमितपणे कामांना आरक्षित करून मजूर सहकारी संस्थांना पोसण्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभाग व जि. प. चे सक्षम अधिकारी करीत आहेत.
सर्वसाधारणपणे एकूण कामाच्या रकमेच्या जि. प. मार्फत 15 लाखापर्यंतची कामे व सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत 30 लाखापर्यंतची कामे ही सुशिक्षित बेरोजगार अभियंता-कंत्राटदार, मजूर सहकारी संस्था आणि खुल्या गटासाठी 33:33:34 टक्के असे प्रमाण ठरविलेले आहे. तरीही काही अधिकारी अनियमितपणे कामे आरक्षित करून एका विशिष्ट गटाला कामे मिळवून देण्याच्या हेतूमुळे कुडाळ तालुक्मयातील व संपूर्ण जिल्हय़ातील सुशिक्षित बेरोजगार अभियंता-कंत्राटदार यांच्यावर अन्याय होत आहे.
याबाबत कुडाळ तालुक्मयातील सुशिक्षित बेरोजगार अभियंता-कंत्राटदार यांनी आमदार नाईक यांची भेट घेऊन हा अन्याय दूर करण्याची मागणी केली आहे. यामध्ये ऑनलाईन निविदा प्रक्रियेत कामे आरक्षित करताना ती तालुकानिहाय आरक्षित करावीत. तसेच एकूण कामाच्या रकमेच्या सुशिक्षित बेरोजगार अभियंता-कंत्राटदार, मजूर सहकारी संस्था आणि खुले कंत्राटदार यांना 33:33:34 टक्के या प्रमाणातच कामांचे आरक्षण मिळावे व न्याय मिळवून द्यावा, असे त्यांनी म्हटले आहे.