गुरूवर्य इंद्रजीत देशमुख यांचे प्रतिपादन, मिरजेत प्रबोधिनी पब्लिक स्कुलचे उद्घाटन
प्रतिनिधी / मिरज
देश आधुनिकतेकडे झेपावत असला तरी सध्याची बदलत चाललेली परिस्थिती मात्र खुपच भयावह आहे. सध्याचा समाज स्वार्थी, संकुचित, लबाड आणि भ्रष्टाचाराने बरबटलेला आहे. भविष्यात ही परिस्थिती बदलावयाची असेल तर सुस्वरुप समाज निर्मितीसाठी पालक आणि शिक्षकांनी आत्तापासूनच आपल्या पाल्याला सर्वगुण संपन्न आणि प्रतिभावान बनविले पाहिजे, असे प्रतिपादन शिवम प्रतिष्ठानचे संस्थापक गुरूवर्य इंद्रजीत देशमुख यांनी केले. ‘हम दो हमारे दो, आई-बाबा फेक दो’ ही संस्कृती नष्ट झाली पाहिजे, असेही ते म्हणाले.
शहरातील गुरूकुल शिक्षण संस्थेच्या ज्ञान प्रबोधिनी आणि प्रज्ञा प्रबोधिनी विद्यालयाची पालक सभा आणि इंग्रजी माध्यमाच्या ‘प्रबोधिनी पब्लिक स्कुल’चा उद्घाटन समारंभ रविवारी बालगंधर्व नाटय़गृहात इंदजीत देशमुख यांच्या हस्ते पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी गुरुकुल शिक्षण संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष प्रा. मोहन वनखंडे होते.