आयआयटीतून 260 अभियंते घेणार : 10 हजार अभियंते कार्यरत
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
स्मार्टफोनसह इलेक्ट्रॉनिक्स ग्राहकोपयोगी वस्तूंच्या निर्मितीमध्ये कार्यरत असणाऱया दिग्गज सॅमसंग कंपनीने येत्या काळामध्ये 1 हजार अभियंत्यांना आपल्या कंपनीमध्ये सामावून घेण्याचा निर्णय घेतला आहे.
अभियांत्रिकी महाविद्यालयांमधून व अभियांत्रिकी संस्थांमधून यावषी हजार अभियंत्यांना नव्याने भरती करण्याचा विचार कंपनीने चालवला आहे. या संदर्भातली योजना कंपनीने सविस्तर आखली असून 260 अभियंते हे एकटय़ा आयआयटी संस्थांमधून निवडले जाणार आहेत. काही बाबतीत कॅम्पस मुलाखतीतून नव्या उमेदवारांना निवडलं जाणार आहे, असे कळते. याखेरीज नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी, इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी त्याचप्रमाणे बिट्स पिलानी अशा संस्थांमधूनही उमेदवारांची भरती करून घेतली जाणार आहे. बेंगळूर, दिल्ली, नोएडा, मुंबई, खरगपूर, कानपूर, भुवनेश्वर, रुरकी, गोवा यासारख्या शहरातील संस्थांमधून सदरची उमेदवारांची भरती केली जाणार असल्याचेही सॅमसंग कंपनीने स्पष्ट केले आहे.
सध्याच्या काळामध्ये 10000 अभियंते विविध संशोधन व विकास केंद्रांमध्ये कार्यरत असल्याचे कंपनीने म्हटले आहे. 2019 मध्ये घेतलेल्या कॅम्पस भरतीतून 1200 अभियंत्यांची निवड करण्यात आली होती. कोरोनामुळे परीक्षा लांबणीवर पडल्यामुळे भरती प्रक्रियेला विलंब झाला असल्याची बाब सॅमसंगने अधोरेखित केली आहे.