वृत्तसंस्था / नवी दिल्ली
रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेतील रविवारी येथे झालेल्या क गटातील सामन्यात सेनादलाने महाराष्ट्राचा एक डाव आणि 94 धावांनी दणदणीत पराभव करत 7 गुण वसूल केले.
या सामन्यात महाराष्ट्राचा पहिला डाव 44 धावांत आटोपल्यानंतर सेनादलाने पहिल्या डावात 285 धावा जमविल्या. त्यानंतर सेनादलाच्या भेदक गोलंदाजीसमोर महाराष्ट्राचा दुसरा डाव 48.1 षटकांत 147 धावांत आटोपला. सेनादलाच्या कटारियाने 49 धावांत 5 तर पांडेने 56 धावांत 5 गडी बाद केले. या स्पर्धेतील सेनादलाचा हा दुसरा विजय आहे. सेनादलाने हा सामना अडीच दिवसात जिंकला.
संक्षिप्त धावफलक
महाराष्ट्र प. डाव सर्वबाद 44, सेनादल प. डाव- सर्वबाद 285, महाराष्ट्र दु. डाव-48.1 षटकात सर्वबाद 147.