लेफ्टनंट जनरल स्तरावर तिसऱयांना संवाद
वृत्तसंस्था/ लडाख
भारत आणि चीनमध्ये मंगळवारी भारतीय भूमीवर लेफ्टनंट जनरल स्तरावरील अधिकाऱयांनी एकमेकांची भेट घेतली. पूर्व लडाखमधील संघर्ष निर्माण होणाऱया क्षेत्रापासून सैनिक दूर नेण्याच्या विषयावर दोन्ही अधिकाऱयांनी चर्चा केली. लडाखमध्ये एलएसीजवळील चुशूल सेक्टर येथे दोन्ही अधिकाऱयांनी संवाद साधला.
गेल्या 15 दिवसांपासून लडाखमधील गलवान घाटीवरुन दोन्ही देशांमध्ये तणाव निर्माण झाला आहे. चीनने धोकेबाजीने भारतीय जवानांवर हल्ला केला. भारताच्या प्रतिहल्ल्यानंतर तातडीने चीनने माघारीची भाषा सुरु केली. सीमेवर संघर्ष नको, अशी भूमिका घेत चर्चेची मागणी केली. त्यानुसार मंगळवारी लेफ्टनंट जनरल स्तरावरील चर्चा झाली. या चर्चेमध्ये सैनिकांच्या माघारीच्या रुपरेषेला अंतिम स्वरुप देण्याचा प्रयत्न करण्यात आला. 14 व्या कोअरचे कमांडर लेफ्टनंट जनरल हरिंदर सिंह यांनी भारताचे नेतृत्व केले. तर चीनकडून तिबेट जिल्हा सैन्य विभागाचे मेजर जनरल लियु लिन यांनी नेतृत्व केले.
पहिल्या दोन टप्प्यातील चर्चेवेळी भारताने पूर्वस्थिती कायम करणे, गलवान घाटी, पँगाँग सरोवर आणि अन्य क्षेत्रातून चीनच्या सैनिकांनी तत्काळ माघार घ्यावी, या मागण्या ठासून मांडल्या. मात्र त्यावर कोणताच निर्णय होऊ शकला नाही. दरम्यानच्या कालावधीत पूर्व लडाखमध्ये निर्माण झालेला तणाव व संघर्षांमध्ये 15 जून रोजी जोरदार चकमक उडाली. त्यानंतर 22 रोजी झालेल्या बैठकीत तणावग्रस्त भागातून दोन्ही देशांनी सैनिक मागे घेण्याबाबत एकमत झाले. तथापि अद्यापही त्याची अंमलबजावणी झाली नाही. पहिल्या दोन टप्प्यातील चर्चा एलएसीजवळ चीनच्या हद्दीत मोल्डो येथे झाली. यामध्ये 14 व्या कोअरचे कमांडर लेफ्टनंट जनरल हरिंदर सिंह यांनी नेतृत्व केले. तर चीनकडून तिबेट सैन्य विभागाचे मेजर जनरल लियु लिन यांनी नेतृत्व केले होते.