प्रतिनिधी / बेळगाव
येथील विश्वेश्वरय्या तांत्रिक विद्यापीठाच्या मैदानावर दि. 4 ते 15 फेब्रुवारीपर्यंत सैन्य भरती होणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी दिली. लष्कर भरतीसाठी सहा जिह्यांतील उमेदवार येणार असून त्यांना पायाभूत सुविधा पुरविण्याची सूचना जिल्हाधिकाऱयांनी अधिकाऱयांना केली आहे.
लष्कर भरतीच्या पार्श्वभूमीवर बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयात अधिकाऱयांची बैठक झाली. बेळगाव, रायचूर, यादगिरी, बिदर, कोप्पळ व गुलबर्गा जिह्यांतून लष्कर भरतीसाठी पात्र उमेदवार येणार आहेत. यासंबंधी आवश्यक कागदपत्रांसह 4 डिसेंबरच्या आत भारतीय सेना दलाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी अधिसूचना जारी करण्यात आली होती.
सहा जिह्यांतील 40 हजार पात्र उमेदवारांनी लष्कर भरतीसाठी संकेतस्थळावर नोंदणी केल्या आहेत. नोंदणी केलेल्या उमेदवारांना www.रदग्हग्ह्ग्aहस्ब्. रदन्.ग्ह या संकेतस्थळावर प्रवेशपत्रे देण्यात येणार आहेत. यावेळी सैन्य भरतीसाठी पोलीस व जिल्हा प्रशासनाने सहकार्य करण्याचे सेना विभागाच्या नियुक्ती संचालकांनी बैठकीत सांगितले.
यावेळी जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ, सेना विभागाचे संचालक राहुल आर्या, पोलीस उपायुक्त विक्रम आमटे, विश्वेश्वरय्या तांत्रिक विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. ए. जी. बुजारकी, पोलीस उपअधीक्षक करुणाकर शेट्टी, एसीपी गणपती गुडाजी, आरोग्य व कुटुंब कल्याण अधिकारी डॉ. शशिकांत मुन्याळ, जिल्हा क्रीडा अधिकारी व्ही. एस. पाटील, बीएसएनएलचे अधिकारी एन. टी. बाळेकुंद्री आदी उपस्थित होते.