वार्ताहर / हरमल
तुये पंचायत क्षेत्रातील सोंण्ये पालये परिसरात पाणी टंचाई तीव्रपणे भेडसावत असल्याने नागरिकांच्या तक्रारीनंतर ’उदरगत’ संस्थेचे अध्यक्ष तथा मगोचे नेते जित आरोलकर यांनी स्वखर्चाने पाणी पुरवठा केल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
गेले चार दिवस पालये परिसरातील नागरिक व भगिनींची बरीच तारांबळ उडाली होती.भगिनींचा टाहो व नागरिकांच्या गैरसोयीची दखल मांदे मतदारसंघाचे मगो नेते तथा उदरगत संस्थेचे अध्यक्ष जित आरोलकर यांनी स्वखर्चाने टँकरद्वारे पाणी पुरवठा केला.
दरम्यान,स्वतःच्या घरांत नळजोडणी असूनही पाणी पुरवठा अनियमित होत असल्याने,निषेध म्हणून, काही नागरिक नळ जोडण्या बंद करण्याच्या तयारीत असल्याचे काही ग्रामस्थांनी बोलून दाखविले.पेडणेतील मुख्य अभियंता वॉलसन यांची बदली होत नाही तोवर तालुक्मयात पाणी टंचाईची समस्या दूर होणारी नसल्याचे नागरिकानी सांगितले.