प्रतिनिधी/ सातारा
शहरातील दररोज तयार होणारा कचरा सोनगाव कचरा डेपोत टाकला जातो. या कचऱयालाच शनिवारी सायंकाळी उशिरा आग लागली. त्यामुळे सगळीकडे धुराचे प्रचंड लोळ झाले आहेत. रविवारी सकाळपासून सातारा पालिकेचे अग्निग्नशमन दल ही आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करत होते. उपाध्यक्ष मनोज शेंडे यांच्यासह मुख्याधिकारी अभिजित बापट व काही नगरसेवकांनी कचरा डेपोत हजेरी लावून आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले. परंतु 24 तासानंतरही रविवारी उशिरापर्यंत आग आटोक्यात आली नव्हती. दरम्यान, बायोमायनिंग प्रकल्प पूर्ण झाला असता तर आज वणवाच लागला नसता अशी चर्चा सुरु आहे.
पालिकेच्या सोनगाव कचरा डेपोला शनिवारी सायंकाळी आग लागल्याची घटना घडली. या आगीत कचऱयाने पेट घेतल्याने सगळीकडे धुराचे प्रचंड लोळ झाले असून बाजूच्या गावांमध्ये धुराचे वातावरण झाले आहे. आग आटोक्यात आणण्यासाठी सातारा पालिकेच्या अग्निग्नशमन दलाचे पथक शनिवारपासून प्रयत्न करत आहे. आग आटोक्यात येत नव्हती.
रविवारी सकाळी सातारा पालिकेचे उपाध्यक्ष मनोज शेंडे, मुख्याधिकारी अभिजित बापट यांच्यासह काही नगरसेवक यांनी कचरा डेपोला भेट दिली अन् लागलेली आग आटोक्यात कशी आणता येईल याच्या सूचना दिल्या. तरीही आग आटोक्यात येत नव्हती. दुपारी आग आटोक्यात आली होती, परंतु पुन्हा वाऱयामुळे आगीचे लोळ आकाशाकडे झेपावू लागले होते. दरम्यान, बायोमायनिंगचा प्रकल्प पूर्ण झाला असता तर कचऱयाला आग लागली नसती अशी भावना सातारकर व्यक्त करत आहेत. सातारा पालिकेचे अग्निग्नशमन दलाचे कर्मचारी ही आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत. शनिवारी लागलेली आग 24 तासानंतर म्हणजे रविवारी रात्री उशिरापर्यंत सुरूच होती. घटनाळस्थळी मुख्याधिकारी अभिजीत बापट यांच्यासह उपनगराध्यक्ष, नगरसेवक व पालिका कर्मचारीही रविवारी दिवसभर त्याच कामात व्यस्त होते.