सहा गावातील ५६ कुटुंबांना केले जिवनावश्यक वस्तूंचे वितरण
ओटवणे /प्रतिनिधी-
तेरेखोल नदीच्या महापुराचे पाणी शिरून शेकडो घरे, शेतमांगर, दुकान यांचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले. अनेकांकडून मदतीचा ओघ सुरू आहे. मात्र अद्याप पर्यंत ज्यांना मदत पोहोचलेली नाही अशा पूरग्रस्तांसाठी सोनुर्ली पाक्याचीवाडी येथील नवयुवक कला क्रीडा मंडळाने पुढाकार घेत सहा गावातील ५६ कुटुंबांना केले जिवनावश्यक वस्तूंचे वितरण केले.
या मंडळाच्या माध्यमातून इन्सुली, ओटवणे, वाफोली बांदा, सरमळे, विलवडे या सहा गावातील ५६ कुटुंबाना जिवनावश्यक वस्तूंचे वितरण करण्यात आले. यावेळी सर्व पुरग्रस्तानी मंडळाचे आभार मानले. यावेळी मंडळाचे अध्यक्ष संतोष ओटवणेकर, सत्यवान हिराप, सचिन साळगावकर, सत्यवान नाईक, दाजी अणावकर, सदू मसुरकर, अमोल सावंत, राजन मठकर आदी उपस्थित होते.