मुंबई / वृत्तसंस्था
अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारतातील शेअरबाजारांची चांगलीच घसरण झाली आहे. मुंबई शेअरबाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 700 हून अधिक अंकांनी खाली आल्याने गुंतवणूकदारांचे 3 लाख कोटी रूपयांचे नुकसान झाले, असे सांगण्यात आले. मात्र अनेक गुंतवणूकदारांनी शेअरबाजारातून पैसा काढून तो सोन्यात गुंतविण्यात प्रारंभ केल्याने सोन्याच्या दरात गेल्या दोन दिवसांमध्ये 1800 रूपये प्रतितोळा वाढ झाली आहे. आता सोनेदराने 41 हजार रूपयांची मर्यादाही पार केल्याचे दिसून येत आहे.