प्रतिनिधी/ रत्नािगरी
कोकणात गणेशोत्सव मोठय़ा जल्लोषात साजरा होत असताना यावर्षी मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियमांचे पालन करून हा उत्सव साजरा होत आहे. या गणेशोत्सवात गौरी पूजनालाही तितकेच महत्व आहे. गणेशाची माता पार्वती म्हणजेच गौरी…वर्षातून दोन दिवस गौरी माहेरी राहण्यासाठी येते. अशा या लाडक्या गौराईचे रविवारी महिलांनी अगदी मोठय़ा थाटात आणि उत्साहात आगमन केले व तिचे विधीवत पूजन करून प्रतिष्ठापना केली.
महाराष्ट्रात गौरी-गणपती हा उत्सव अगदी उत्साहात साजरा होतो. या उत्सवाची लगबग श्रावण महिन्यापासूनच सुरू होते. गणपतीच्या आगमनानंतर तिसऱया दिवशी गौरी येतात. विविध प्रांतानुसार गौरी पूजनाची प्रथा आहे. गौरी पूजन सोहळा प्रत्येक भागानुसार वेगवेगळय़ा परंपरेनुसार आहे. वेगळी परंपरा प्रत्येक प्रांत आणि भागाप्रमाणे गौरी उत्सवाची पद्धत बदलते. कोकण असो वा इतर प्रांत असो, या भागात उत्सवाची वेगळी पद्धत पहायला मिळते. पण, महिलांच्या या सणात भक्तीभाव एकच असतो. माहेरवाशीण असलेल्या गौराईचा तितक्याच लाडाने पाहुणचार केला जातो. काही ठिकाणी गौरीला महालक्ष्मीही म्हणतात. गौरी आगमनाच्या दिवशी महालक्ष्मीची स्थापना करतात.
कोकणात या सणासाठी मुली माहेरी जातात. कोकणात काही भागात फुलांच्या गौरींची तर खडय़ांच्या गौरींची पद्धत आहे. रत्नागिरीत गौरी आवाहन करुन गावोगावी गौरी आणल्या जातात. काही ठिकाणी विहिरीवरुन, नदीवरुन सात खडय़ांच्या रुपात गौरी आणली जाते. तर काही ठिकाणी गौरीचे मुखवटे सुंदर साडी, चोळीने सजवून त्यांची पूजा व आराधना केली जाते. बऱयाच भागात लाकडी गौरी असतात. मुखवटेही असतात. दरवर्षी त्यांना साडी नेसवून अगदी देवाप्रमाणे नटवतात. महिला आपल्या गौरीचा साजश्रुंगार प्रेमाने करतात. गौरी पूजनात गौरीला गोडाचा तसेच काही ठिकाणी तिखटाचा नैवेद्य केला जातो. त्यामुळे हे दोन दिवस गौराईला गणेशाच्या शेजारी पुजनाचा मान मिळतो.
महिलांकडून गौराईची आराधना
गौराईची आरती, विविध गीते, गाणी म्हटली जातात आणि या सगळ्य़ात महिलाच पुढाकार घेवून गौराईची आराधना करतात. विवाहित महिला आपल्या सौभाग्याचे लेणं मागण्यासाठी आणि कुमारीका आपल्याला चांगले सौभाग्य मिळावे, यासाठी गौरी पूजा व्रत करतात.5 दिवसांच्या गणपतीसोबतच विसर्जनादिवशीच गणेशाबरोबर गौरीचे विसर्जन केले जाते. 13 सप्टेंबरला 5 दिवसांचे गणपती व गौरीचे विसर्जन होणार आहे. कोरोनामुळे नियमांचे पालन करत या सणाची पंरपरा जपली जात आहे, हेच या उत्सवाचे महत्व आहे.