सातारा / प्रतिनिधी :
केंद्र सरकारने केलेल्या कृषी कायद्यांना विरोध म्हणून पुकारण्यात आलेल्या सोमवारच्या (दि. 27) संपात श्रमिक मुक्ती दल सहभागी होणार आहे, अशी माहिती पत्रकाद्वारे श्रमिक मुक्ती दलाचे डॉ. भारत पाटणकर यांनी दिली. देशभरातील 100 पेक्षा जास्त असंघटित कामगार, विद्यार्थी, कर्मचारी, महिला, प्राध्यापकांच्या विविध संघटनांनी भारत बंदची हाक दिली असून, सकाळी सहा ते संध्याकाळी चार वाजेपर्यंत हा बंद चालणार आहे. या बंदमध्ये सर्वांनी सहभागी होणे महत्त्वाचे आहे, असे डॉ. पाटणकर यांनी सांगितले.