प्रतिनिधी/ रत्नागिरी
विलिनीकरणाच्या मुद्यावर संपावर असलेल्या एसटी कर्मचाऱयांना संप मागे सोमवारपर्यंत कामावर हजर राहिल्यास कर्मचाऱयांचे निलंबनही तत्काळ मागे घेण्यात येईल, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले. दरम्यान शुक्रवारी जिह्यातील एसटी फेऱयांमध्ये किरकोळ वाढ झाली आहे.
जिह्यात शुक्रवारी एसटीच्या 270 हून अधिक फेऱया सोडण्यात आल्य़ा विभागात 165 चालक-वाहक कामावर हजर झाल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. रत्नागिरी आगारातून अद्याप एकही बस सोडण्यात आलेली नसी तरी अन्य ठिकाणाहून बसफेऱयांची संख्या वाढली आह़े जिह्यात सद्यस्थितीत 67 चालक, 62 वाहक व 29 चालक-वाहक कामावर हजर होत़े सुरु असलेल्या बसवाहतुकीला जिह्यात प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आह़े
दापोली आगारातून 34 कर्मचारी निलंबित
मौजे दापोलीः येथील एसटी आगारातील संपात सहभागी कर्मचाऱयांपैकी 34 जणांना निलंबित करण्यात आल्याचे आगाराकडून सांगण्यात आले. या संपामुळे सर्वसामान्य जनता व विद्यार्थ्यांचे हाल होत असून महामंडळाकडून कर्मचाऱयांवर कारवाईचे सत्र सुरू करण्यात आले आहे. दापोली आगारात सध्या 95जण सेवा बजावत आहेत. या आधी 107 जण कामावर रूजू झाले होते, परंतु त्यातील काहीजण पुन्हा संपात सहभागी झाल्याचे समोर आले आहे. दापोली आगारातील 5 कर्मचाऱयांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. कर्मचारी कमतरतेमुळे तालुक्यांमध्ये सेवा देताना आगाराला तारेवरची कसरत करावी लागत आहे.