– राजारामपुरी व्यापारी असोसिएशनच्या बैठकीत निर्णय
प्रतिनिधी/कोल्हापूर
तीन महिन्यापासून व्यापार बंद असल्यामुळे दुकानातील मालाचे नुकसान होत आहे. कर्मचाऱयांचे पगार थकले आहेत, कर कसा भरायचा याची चिंता आहे. यामुळे सोमवारपासून (दि 5) कोणत्याही परिस्थितीत सरसकट दुकाने उघडण्याचा निर्णय राजारामपुरी व्यापारी असोसिएशनच्या बैठकीत घेण्यात आला.
महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे उपाध्यक्ष ललित गांधी , कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संजय शेटे यांच्या उपस्थितीत शनिवारी सकाळी राजारामपुरी जनता बझार चौकात राजारामपुरी व्यापारी असोसिएशनची बैठकी झाली. या बैठकीत व्यापाऱयांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. कोल्हापूर जिल्हÎातील कोरोना रुग्णसंख्येत घट होत नसल्याने प्रशासनाने लॉकडाऊनचे निर्बंध कायम ठेवले आहेत. पण व्यापाऱयांकडून दुकाने उघडण्याची परवानगी मागितली जात आहे. गेल्या आठवडÎात याबाबत पोलीस अधीक्षक डॉ. शैलेश बलकवडे यांनी व्यापाऱयांची बैठक घेऊन जिल्हाधिकाऱयांशी चर्चा करुन शासनाला अहवाल पाठवण्याचे आश्वासन दिले होते. त्याप्रमाणे अहवाल पाठवून मुंबईत यासंदर्भात बैठकही झाली. पण दुकाने उघडण्याबाबत स्पष्ट आदेश झाले नाहीत.
दुकाने उघण्यास अद्याप परवानगी न मिळाल्याने व्यापारी आक्रमक झाले आहेत. शनिवारी झालेल्या बैठकीत बोलताना ललित गांधी म्हणाले, यापुढे आता कोणाशीही चर्चा करणार नाही. तसेच कुठल्याही कारवाईला भीक न घालता जशास तसे उत्तर देत सोमवारपासून सरसकट दुकाने उघडणार. रक्षा राऊत म्हणाल्या, महिला असून मार्च महिन्यापासून उद्योग सुरु केला. पण लॉकडाऊनमुळे अडचणी निर्माण झाल्या आहेत. कामगारांचे पगार, भाडे कसे द्यायचे असा प्रश्न निर्माण झाला आहे. रणजित पारेख म्हणाले, अन्य बहुतांश व्यवहार सुरु असताना दुकानेच बंद का? दुकानातील माल खराब होत आहे.व्यवसाय नसल्याने कर थकला आहे तर व्याज वाढत आहे. अनिल पिंजानी म्हणाले, दुसऱया लॉकडाऊनमुळे नुकसान झाले आहे.बेरोजगारी वाढून आर्थिक प्रश्न निर्माण झाला आहे. यामुळे प्रशासनाने दुकाने उघडण्यास परवानगी द्यावी.
बैठकीला माणिक पाटील,परफ्युम असोसिएशनचे विनोद कटारिया, शिवप्रभा लाड, नितेश जैन, भरत रावत,अमित लोंढे, आयुष्य हंजे, शाम बासरानी उपस्थित होते.