438 कोरोनाबाधित रुग्ण आढळले : आठवडय़ातील सर्वात कमी रुग्णसंख्या, सहा जणांचा मृत्यू
प्रतिनिधी / बेळगाव
कोरोनाबाधितांचा आकडा हा दररोज हजारच्या वरच जात होता. मात्र, सोमवारी हा आकडा काहीसा कमी झाला आहे. त्यामुळे दिलासा मिळाला आहे. या आठवडय़ात 438 हा सर्वात कमी आकडा पहिल्यांदाच पुढे आला आहे. त्यामुळे आता यापुढे रुग्ण कमी होण्याची शक्मयता व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, हे सर्व जनतेवरच अवलंबून आहे. कारण कोरोनाचे नियम पाळले तरच ही आकडेवारी कमी होणार असल्याचे आरोग्य खात्याने म्हटले आहे.
सोमवारी तालुक्मयामधील 251 रुग्ण ज्यामध्ये शहरातील 197 जणांचा तर ग्रामीण भागातील 54 जणांचा समावेश आहे. पहिल्यांदाच हा आकडा कमी झाल्यामुळे यापुढे आकडेवारी कमी होणार की वाढणार, हे आता येत्या एक-दोन दिवसांत निश्चित होणार आहे. जनतेने सहकार्य करावे, असे आवाहन वारंवार आरोग्य विभागातर्फे करण्यात आले आहे. मात्र, आतापर्यंत तरी जनतेने म्हणावे तसे सहकार्य केलेले नाही.
त्यामुळेच हा आकडा वाढत गेल्याचे आरोग्य विभागासह इतर वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञांनी म्हटले आहे.
कोरोनाबाधितांचेच नव्हे तर मृत्यूचे प्रमाणही वाढले होते. जिल्हा प्रशासनाने मृत्यूचे प्रमाण कमी दाखविले तरी प्रत्यक्षात मात्र हा आकडा वेगळाच असल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर पोलिसांनी विनाकारण फिरणाऱयांवर कारवाईचा बडगा उचलला आहे. अनेकांची वाहने जप्त केली आहेत तर अनेकांवर दंडात्मक कारवाईही केली आहे. त्यामुळे आता विनाकारण फिरणाऱयांची संख्या कमी झाली आहे.
सोमवारी शहरातील कॅम्प, चन्नम्मानगर, चव्हाट गल्ली बेळगाव, चिदंबरनगर, गुड्सशेड रोड, गणेशपूर, हनुमाननगर, हिंदवाडी, जाधवनगर, काळी आमराई, अनगोळ, खासबाग, कोनवाळ गल्ली, महाद्वार रोड, महांतेशनगर, मार्कंडेयनगर, आनंदनगर वडगाव, आझमनगर, बाजार गल्ली वडगाव, भांदूर गल्ली बेळगाव, बसव कॉलनी, भाग्यनगर, भारतनगर, शहापूर, संभाजीनगर-वडगाव, शाहूनगर, शास्त्राrनगर, शांतीनगर टिळकवाडी, शिवाजीनगर, नेहरूनगर, मुजावर गल्ली, ओमनगर, रामतीर्थनगर, सदाशिवनगर यासह इतर परिसरात रुग्ण आढळले आहेत.
ग्रामीण भागातील बडस, बस्तवाड, बेळगुंदी, बेनकनहळ्ळी, हिंडलगा, हिरेबागेवाडी, होनगा, हुंचेनहट्टी, काकती, कंग्राळी बी.के., मच्छे, पिरनवाडी, मोदगा, मुचंडी, निलजी, पंतबाळेकुंद्री, राकसकोप, सांबरा, सरस्वतीनगर-गणेशपूर, हिंडलगा-सुळगा, शिवापूर, सुळेभावी, शिंदोळी यासह इतर गावांमध्येही रुग्ण आढळले आहेत.
सोमवारी सहा जणांचा मृत्यू
कोरोनामुळे सोमवारी सहा जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे जिल्हय़ामध्ये आतापर्यंत 399 जणांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण वाढले असून गेल्या काही दिवसांमध्ये दररोज पाच ते सहा जणांचा मृत्यू होताना दिसत आहे. सोमवारी शंभरजण कोरोनामुक्त
जिल्हय़ामध्ये सध्या 13 हजार 764 कोरोना सक्रिय रुग्ण आहेत. त्यांच्यावर विविध हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. सोमवारी शंभरजण कोरोनामुक्त झाले असून त्यांना घरी पाठविण्यात आले आहे. सोमवारी सहा जणांचा मृत्यू झाल्यामुळे आता हा आकडा 399 वर पोहोचला आहे. आतापर्यंत जिल्हय़ामध्ये 48 हजार 569 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. आतापर्यंत 34 हजार 406 रुग्ण कोरोनातून मुक्त झाले आहेत. इतरांवर उपचार सुरू असल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे.