जनजीवन विस्कळीत : पावसामुळे शेतकऱयांना मोठा दिलासा, शेती कामांना मिळणार गती
प्रतिनिधी /बेळगाव
गेल्या काही दिवसांपासून पावसाला सुरुवात झाली आहे. मात्र म्हणावा तसा जोर नव्हता. त्यामुळे दमदार पावसाची अपेक्षा व्यक्त होत होती. त्या अपेक्षेनुसार सोमवारी दिवसभर संततधार पाऊस कोसळला. त्यामुळे शहरातील जनजीवन काहिसे विस्कळीत झाले. मात्र पावसाने पिकांना दिलासा दिला. तसेच शेतीतील इतर कामांना गती मिळणार आहे. त्यामुळे शेतकऱयांतून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
सोमवारी सकाळपासूनच पावसाची संततधार सुरू होती. अधूनमधून दमदार सरी कोसळत होत्या. त्यामुळे शहरातील सखल भागांमध्ये तसेच रस्त्यावर असलेल्या सखल भागांमध्ये पाणी साचून होते. सकाळपासूनच पावसाला सुरुवात झाल्यामुळे साऱयांनाच घरातून बाहेर पडताना छत्री, रेनकोटचा आधार घ्यावा लागला. संततधार पावसाने साऱयांच्याच आशा पल्लवित झाल्या असून पेरणी झालेल्या पिकांना जीवदान मिळाले आहे.
शहर आणि परिसरात पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. अनेक ठिकाणी स्मार्ट सिटीची कामे सुरू आहेत. त्या ठिकाणी चिखलाचे साम्राज्य पसरले होते. अनेक रस्त्यांवरील सखल भागांमध्ये पाणी तुंबले होते. त्यामधून वाहने जाताना ते पाणी ये-जा करणाऱया नागरिकांवर आणि वाहनांवर उडत होते. या पावसामुळे दुचाकीस्वार तसेच विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागला.
व्यापाऱयांची चांगलीच त्रेधातिरपीट
यावर्षी उशिराने मान्सून दाखल झाला आहे. गेल्या आठ दिवसांपासून पावसाची अधूनमधून रिपरिप सुरू होती. मात्र म्हणावा तसा पावसाला जोर नव्हता. सोमवारी पावसामुळे वाहनचालक, भाजीविपेते, फळविपेते, फेरीवाले यांसह इतर बैठय़ा व्यापाऱयांची चांगलीच त्रेधातिरपीट उडाली होती. पावसामुळे गटारीतील कचरा मोठय़ा प्रमाणात अडकून बऱयाच ठिकाणी पाणी रस्त्यावरून वाहत होते.
रस्त्यावर थांबलेल्या पाण्यामधून वाहन चालविणे अवघड जात होते. नेहमीप्रमाणे बसवेश्वर सर्कलजवळही पाणी तुंबून होते. धर्मवीर संभाजी चौक येथे स्मार्ट सिटीअंतर्गत बांधलेल्या बसथांब्यासमोरच पाणी तुंबून होते. बसथांब्यामध्येही पाणी शिरले होते. त्यामुळे प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागला.
या पावसामुळे बाजारपेठेत काही ठिकाणी चिखल निर्माण झाला होता. यामधून खरेदीदारांना वाट काढताना कसरत करावी लागली. मध्यवर्ती बसस्थानकाच्या आवारातही पाणी साचून होते. याचा फटका प्रवाशांना सहन करावा लागत आहे. त्यामुळे अंतर्गत रस्ते आणि कार्यालयीन काम पूर्ण होत नाही तोपर्यंत प्रवाशांना त्रास सहन करावा लागणार आहे. अंतर्गत कामेही तातडीने पूर्ण करण्यासाठी धडपड करण्याची गरज निर्माण झाली आहे.
गटारी सफाईकडे दुर्लक्ष
यावषी गटारी सफाई तसेच नाले सफाई योग्यप्रकारे झाली नसल्यामुळे पाण्याचा निचरा होणे कठीण झाले आहे. ही समस्या सोडविण्यासाठी महानगरपालिका लक्ष देणार काय? असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये काही ठिकाणी भूमिगत वीजवाहिन्या तसेच गॅसची पाईपलाईन घालण्याचे काम सुरू आहे. त्यासाठी मोठय़ा प्रमाणात खोदाई करण्यात आली आहे. मात्र ते खड्डे योग्य प्रकारे बुजविले नाहीत. त्यामुळे त्या परिसरात चिखलाचे साम्राज्य पसरले आहे.
गटारीतील पाणी रस्त्यांवर
मारुती गल्ली येथील गटारी साफ न केल्यामुळे गटारीत कचरा अडकून पाणी रस्त्यावरून वाहत होते. त्यामुळे पादचाऱयांना त्यामधून वाट काढताना कसरत करावी लागत होती. तानाजी गल्ली परिसरातही गटारी भरून पाणी रस्त्यावरून वाहत होते. या पाण्यामधून गटारीमधील कचरा रस्त्यावर साचून आहे. गटारीतील पाणी काही जणांच्या घरांच्या उंबऱयापर्यंत पोहोचले होते. पहिल्याच संततधार पावसामुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याने जर जोरदार पाऊस आला तर गंभीर परिस्थिती निर्माण होण्याची भीती व्यक्त होत आहे.