प्रतिनिधी/ बेळगाव
सोमवारी कोरोना रुग्णसंख्येत घसरण झाली आहे. दिवसभरात 182 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून 11 जण दगावले आहेत. गेल्या आठ दिवसांमध्ये रोज चार शतकांचा आकडा बाहेर पडत होता. सोमवारी तो निम्म्यावर येऊन पोहोचला आहे.
उपलब्ध माहितीनुसार दिवसभरात 182 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामध्ये बेळगाव शहर व तालुक्मयातील 41 हून अधिक जणांचा समावेश आहे. चिकोडी तालुक्मयातही रुग्णसंख्या अर्धशतकावर पोहोचली आहे. त्यापाठोपाठ बैलहोंगल तालुक्मयात 22 जणांना कोरोनाची लागण झाली आहे.
सोमवारी 280 हून अधिक जण कोरोनामुक्त
दरम्यान, सोमवारी 280 हून अधिक जण कोरोनामुक्त झाले असून त्यांना घरी पाठविण्यात आले आहे. आणखी 444 जणांचे अहवाल यायचे आहेत. आतापर्यंत 4 हजार 199 जण पूर्णपणे बरे झाले आहेत. तर 3 हजार 652 जणांवर वेगवेगळय़ा इस्पितळांमध्ये उपचार करण्यात येत आहेत.
जिल्हय़ातील 65 हजार 685 जणांच्या आरोग्यावर आतापर्यंत बारकाईने लक्ष ठेवण्यात आले आहे. चौदा दिवसांच्या क्वारंटाईनची संख्या झपाटय़ाने वाढली असून 17 हजार 914 जण क्वारंटाईनमध्ये आहेत. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर वेगवेगळय़ा शहरातून गावी परतलेल्यांना क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले आहे.
64 हजार 389 जणांची स्वॅब तपासणी
आतापर्यंत 64 हजार 389 जणांची स्वॅब तपासणी करण्यात आली आहे. 55 हजार 114 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. जिल्हा सर्वेक्षण विभागाने दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंतचा मृतांचा आकडा 130 वर पोहोचला आहे. सोमवारी 9 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. प्रत्यक्षात हा आकडा 11 इतका आहे. गोकाक, बेळगाव, चिकोडी, रामदुर्ग तालुक्मयातील मृतांचा यामध्ये समावेश आहे. मृतांमध्ये एका अनोळखीचाही समावेश असून त्याची ओळख पटविण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. बेळगाव, गोकाक, अथणी तालुक्मयात रुग्णसंख्या वाढत चालली आहे.
टीव्ही सेंटर, हनुमाननगर, कणबर्गी, श्रीनगर, वडगाव, सुतगट्टी, सांबरा, सदाशिवनगर, बिम्स क्वॉर्टर्स, विश्वेश्वरय्यानगर, चव्हाट गल्ली, बसव कॉलनी, हुदली, पिरनवाडी, नानावाडी, केएसआरपी मच्छे, मजगाव, भारतनगर, शहापूर परिसरात पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.
5 मृतदेह आठ दिवसांपासून पडून
कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या पाच जणांचे मृतदेह गेल्या आठ दिवसांपासून सिव्हिल हॉस्पिटलमधील शवागारात पडून आहेत. याबरोबरच सोमवारी एका अनोळखीचाही मृत्यू झाला आहे. काही प्रकरणात कुटुंबीयांनी मृतदेह ताब्यात घेतले नाहीत तर काही प्रकरणात मृतांची व्यवस्थित ओळख पटलेली नाही.