प्रतिनिधी/कोल्हापूर
जिह्यातील बहुतांश व्यापार्यांकडून मौशरच्या नावाखाली सोयाबीन शेतकर्यांची लुट सुरु आहे. त्याचबरोबर वजनातही तुट करीत आहेत. यासाठी जिल्हा कृषी अधिकारी व वजन मापक निरीक्षण यांना सूचना देऊन शेतकयांची होणारी लुट थांबवावी, तसेच भात खरेदी केंद्रे सुरु करावीत, अशी मागणी जय शिवराय किसान संघटनेतर्फे शुक्रवारी निवेदनाद्वारे निवासी उपजिल्हाधिकारी शंकरराव जाधव यांच्याकडे करण्यात आली.
संघटनेचे अध्यक्ष शिवाजीराव माने यांच्या शिष्टमंडळाने निवासी उपजिल्हाधिकार्यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.
निवेदनात म्हंटले आहे की, यावर्षी जिह्यामध्ये महापुराने शेतकर्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले आहे. यातूनही नदीकाठ सोडून उर्वरित क्षेत्रावरील सोयाबीन पिक काढणी सध्या सुरु आहे. त्याचा उताराही 50 टक्क्यांनी घटला आहे. यातच सध्या आर्थिक कुचंबनेमुळे शेतकरी सोयाबीन विक्री करीत आहेत. मागील पंधरा दिवसांपूर्वी 11 हजारांहून अधिक असणारा सोयाबीनचा दर आज 5 ते 6 हजारापर्यंत खाली आला आहे. जिह्यातील बरेच व्यापारी मौशरच्या नावाखाली शेतकर्यांनी लुट करीत आहेत.
जिल्हा मार्केटिंग अधिकारी यांनी आधारभूत धान खरेदी योजनेतून, दि महाराष्ट्र राज्य मार्केटिंग फेडरेशन मार्फत हमीभाव देऊन शासकीय भात खरेदी केंद्रे सुरु केली आहेत. परंतु यामध्ये जिह्यातील केवळ चंदगड, आजरा व राधानगरी तालुक्यातच खरेदी केंद्रे सुरु केली आहेत. जिह्यातील पन्हाळा, शाहुवाडी व गगनबावडा या तालुक्यातील शेतकरीही मोठÎा प्रमाणात भात पिक घेत आहेत. त्यामुळे या तालुक्यांमध्ये शासनामार्फत धान खरेदी केंद्रे सुरु करावीत.
शिष्टमंडळात सदाशिव कुलकर्णी, बंडा पाटील, शीतल कांबळे, उत्तम पाटील, प्रल्हाद पाटील, गब्बर पाटील आदींचा समावेश होता.