सोलापूर / प्रतिनिधी
राज्यात कोरोना रुग्णांची संख्या मोठया प्रमाणात वाढत असून, सरकारचे त्यावर नियंत्रण नाही. खाजगी हॉस्पिटल कोरोना रुग्णांकडून अव्वाच्या सव्वा बिल घेत आहेत. त्यामुळे आंधळ दळतंय आणि कुत्र पिठ खातं अशी महाविकास आघाडी सरकारची गत झाली आहे. अशी टीका माळशिरस तालुक्याचे आमदार राम सातपुते यांचा ट्विटर ट्विट करून केली आहे.
कोरोना रुग्णांची संख्या देशासह राज्यात मोठ्या प्रमाणात वाढत असल्यामुळे शाळा, महाविद्यालय बंद असून हे अनेक संस्थेने विद्यार्थ्याकडून शैक्षणिक शुल्कसाठी तगादा लावला आहे. त्यामुळे पालक वर्गातून संताप व्यक्त करण्यात येत आहे. विकास आघाडी सरकार शैक्षणिक शुल्क साठी तगादा लावणार्या संस्थेकडे दुर्लक्ष करीत असून, याकडे गांभीर्याने लक्ष घालने गरजेचे आहे.
कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे सर्व शासकीय हॉस्पिटल हाऊसफुल झाले आहेत. त्यामुळे कोरोना रुग्ण खाजगी हॉस्पिटलमध्ये अ़डमिट होत आहे. खाजगी हॉस्पिटलवर शासनाचे कोणत्याही प्रकारचे नियंत्रण नसल्याने रुग्णांकडून अव्वाच्या सव्वा रुपये शुल्क आकारले जात आहे.
शेती परवडत राज्यातील अनेक शेतकऱ्याने शेतीला जोडधंदा म्हणून दूध व्यवसाय केला आहे परंतु सरकारने योग्य भाव दिला नसल्यामुळे दूध व्यवसाय अडचणीत आला आहे. आर्थिक संकटात सापडला शासनाने त्याला योग्य दर द्यावे अशीही मागणी यावेळी आमदार सातपुते यांनी केली आहे.
शेतकऱ्यांचे हालच हाल
शेतकरी हा वर्षभर शेतात राबराब राबत असतो. मात्र महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष केले आहे. शेतकऱ्यांच्या दुधाला योग्य भाव मिळत नाही तसेच युरिया भेटत नसल्यामुळे विविध ठिकाणी भटकावे लागत आहे. शेतकऱ्यांचे हालच हाल होत आहेत.: राम सातपुते, आमदार, माळशिरस