तरुण भारत संवाद प्रतिनिधी / सोलापूर
सुभाष देशमुख थापाड्या आहे, बंधारा कधी होणारच नाही, झाला तर त्यात पाणी येणार नाही असा प्रचार विरोधकांनी चालू केल्यामुळेच बंधाऱ्याच्या भूमीपूजनाचा कार्यक्रम घ्यावा लागला. काँग्रेसच्या सरकारने जेवढे कर्जमाफीसाठी पैसे दिले त्यापेक्षा जास्त पैसे मोदी सरकार दर वषी शेतकऱ्यांना अनुदान स्वरूपात देत आहे. मात्र श्रेयासाठी काम करण्याची आमची पद्धत नाही, असे प्रतिपादन आमदार सुभाष देशमुख यांनी केले.
तिऱ्हे येथील बॅरेज बंधाऱयाच्या भूमिपूजन प्रसंगी ते बोलत होते. आज तिऱ्हे येथील बंधाऱ्याचे भूमिपूजन झाले, लवकरच याचे उद्घाटनही सर्वांना पहायला मिळेल असेही आमदार देशमुख यावेळी म्हणाले. सोलापूर-कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावर तिऱ्हे येथे होणाऱ्या सीना नदीवरील पुलाचे रूपांतर बॅरेज बंधाऱ्यात करण्यात येणार आहे. या कामाचे भूमिपूजन आमदार देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आ. रणजितसिंह मोहिते पाटील व भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष शहाजी पवार उपस्थित होते.
आ. देशमुख म्हणाले, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून हा प्रकल्प राबवण्यात येत आहे. गडकरी यांचे काम चोख असते. त्यांनी एकदा मनावर घेतले की ते काम झालेच म्हणून समजा. या बॅरेजचा फायदा उत्तर व दक्षिणसह मोहोळ तालुक्मयातील शेतकऱ्यांना होणार आहे.
या कार्यक्रमाला शिखर बँकेचे माजी संचालक अविनाश महागावकर, उत्तर सोलापूर पंचायत समितीचे माजी सदस्य इंद्रजित पवार, जिल्हा सरचिटणीस श्रीमंत बंडगर, तालुकाध्यक्ष काशिनाथ कदम, माजी सरपंच भारत जाधव, राम जाधव, विशाल जाधव, सुनील गुंड, संजय शिंदे, शशिकांत पवार, सुरज मणेरी, विजय जाधव व ग्रामस्थ उपस्थित होते.
कृष्णा–भीमा स्थिरीकरणाशिवाय पर्याय नाही
तिऱहे येथील बॅरेज बंधाऱ्यामुळे परिसरातील शेतकऱयांना फायदा होणार आहे. मात्र जिह्याच्या कायमच्या पाणीप्रश्नावर कृष्णा-भिमा स्थिरिकरण ही योजनाच उत्तर आहे. माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या या संकल्पनेला राजकारणातून विरोध होत आहे. मात्र केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व इतर भाजपच्या नेत्यांनी या योजनेसाठी अनुकूल प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे येणाऱ्या भविष्यात ही योजना प्रत्यक्षात येण्याची आशा आहे.
– रणजितसिंह मोहिते–पाटील, आमदार